शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भुषवणाऱ्यांचा थोडक्यात आढावा.

By admin | Published: November 20, 2015 12:00 AM

1 / 9
ज्योती बसू भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे.
2 / 9
तरुण गोगोई हे आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मे २००१ पासून तीन वेळा आसामचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.
3 / 9
शीला दीक्षित १९९८ सालापासून तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण १५ वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. परंतु २०१३ दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी दीक्षित ह्यांचा दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव केला.
4 / 9
पवनकुमार चामलिंग हे सिक्किम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असलेले चामलिंग मुख्यमंत्रीपदावर १९९४ सालापासून आहेत.
5 / 9
ओक्राम इबोबी सिंग हे मणिपूर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २००२ सालापासून ते सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपदावर निवडून आले आहेत.
6 / 9
नवीन पटनायक हे ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व माजी केंद्रीय खाणमंत्री आहेत. बिजु जनता दल पक्षाचे संस्थापक असलेले पटनायक एक लेखक देखील आहेत. २००० पासून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
7 / 9
माणिक सरकार हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजकारणी आहेत. १९९८ सालापासुन त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट बूरो सदस्य ही आहेत. २०१३ झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीनंतर ते सहाव्यांदा आमदार व चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.
8 / 9
नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे २६ इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७ २००१ पासून मे २२ २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते
9 / 9
भाजपाचा दणदणीत पराभव करून बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या महागठबंधनचे प्रमुख नेते नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली आहे.