शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कबड्डी फायनलमध्ये भारत-इराणच्या खेळाडूंमध्ये राडा! रेफरीं झाले सैरभैर; जाणून घ्या नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 2:50 PM

1 / 6
भारताने पहिल्या हाफमध्ये १५-१० अशी आघाडी घेतली होती, परंतु इराणने दुसऱ्या हाफमध्ये चांगला खेळ केला. ११ गुण, दोन बोनस गुण व १ लोणचे गुण घेत त्यांनी सामना २८-२८ असा बरोबरीत आणला होता.
2 / 6
कबड्डीच्या फायनलमध्ये ड्रामा पाहायला मिळाला. गतविजेता इराण आणि भारत यांच्यात कबड्डीची अंतिम लढतीत शेवटच्या १.०५ मिनिटाच्या खेळाच्याआधी २८-२८ अशी बरोबरी होती. पवनने चढाई केली आणि त्याला पकडण्यासाठी इराणचे बचावपटू सरसावले. त्यांनी पवना कोर्ट बाहेर फेकले, परंतु त्याचवेळी इराणचे ४ खेळाडूही बाहेर गेले.
3 / 6
नियमानुसार भारताला ४ गुण मिळायला हवे होते, परंतु रेफरीने तसं केले नाही. अनेकदा रिप्ले पाहूनही रेफरींनी १-१ असा गुण दिला. नंतर रेफरींनी पुन्हा निर्णय बदलला आणि भारताच्या बाजूने ४-१ असे गुण दिले गेले.
4 / 6
इराणच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा रेफरींनी १-१ असा गुण दिला. त्याचा निशेष म्हणून भारतीय खेळाडू कोर्टवर ठिय्या मांडून बसले.
5 / 6
रेफरींमध्येच गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यांनी जवळपास ३ वेळा हा निर्णय बदलला. अखेर भारताला ३ आणि इराणला १ गुण दिला गेला आणि सामन्यात भारताने ३१-२९ अशी आघाडी घेतली.
6 / 6
भारताने ६५ सेकंदाच्या खेळात ३३-२९ अशी बाजी मारून सुवर्णपदक नावावर केले
टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Kabaddiकबड्डीIndiaभारतIranइराण