शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तथाकथित संत रामपाल अटकनाट्य

By admin | Published: November 19, 2014 12:00 AM

1 / 10
रामपाल यांच्या भक्तांमध्ये महिला लहान मुले वृद्ध अशा सगळ्यांचा समावेश असून हरयाणा राजस्थान पंजाब व दिल्ली परीसरात त्यांचा भक्तसमुदाय पसरला आहे. आश्रमातून हिंसक कारवाया होत असल्या तरी मुलं व महिलांना ओलीस ठेवल्यामुळे पोलीसांच्या कारवाईवर मर्यादा आल्या.
2 / 10
आश्रमाची वीज - पाणी तोडल्यानंतर पोलीसांनी भक्त बाहेर येण्याची वाट बघितली. मात्र हिंसर भक्तांनी पोलीसांवर दगड विटांचा तसेच पेट्रोल बाँबचा व पिस्तुलामधून गोळ्यांचा मारा केला. दोन पोलीसांसह ६ भक्त या सगळ्यात मरण पावले.
3 / 10
हजारो भक्तांना रामपाल यांच्या जवळच्या भक्तांनी व सुरक्षारक्षकांनी ओलीस ठेवल्याचा दावा पोलीसांनी केला अखेर सुमारे १० हजार भक्तांना आश्रमाबाहेर काढण्यात यश आले आणि त्यांना पोलीसांनी सुखरूप रवाना केले.
4 / 10
रामपालना अटक करण्यासाठी पोलीस आले परंतु जवळपास १५ हजार समर्थकांनी आश्रमातून प्रतिकार केल्यामुळे पोलीसांना आश्रमाबाहेर वाट बघत बसावे लागले. हा प्रकार जवळपास दोन दिवस सुरू होता.
5 / 10
शेकडो रामपाल भक्तांनी त्यांच्यावर आलेलं संकट दूर टळावं आणि रामपालना अटक होऊ नये यासाठी धरण्याचा मार्ग अवलंबला.
6 / 10
रामपालांच्या आश्रमापासून दोन किलोमीटरवर पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आणि वाहनांची तपासणी करण्यात आली.
7 / 10
रामपालना अटक करण्यासाठी पोलीसांनी हरयाणातील बरमाल येथील आश्रमाला १८ नोव्हेंबर २०१४ रोजी मंगळवारी चारी बाजुंनी वेढले.
8 / 10
यापूर्वी खुनाच्या आरोपाखाली २२ महिने तुरुंगात घालवलेल्या रामपाल यांच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप रामपाल भक्त करत असून हजारोंच्या संख्येने ते पोलीसांना विरोध करत आहेत.
9 / 10
खुनाच्या आरोपाप्रकरणी आजामीनपात्र वॉरंट असलेल्या स्वयंघोषित संत रामपाल व त्यांच्या खास भक्तांनी हजारो भक्तांना ओलीस ठेवून पोलीसांना वेठीला धरले. मुलं व महिलांचा समावेश असलेल्या सहा भक्तांचा आश्रमात मृत्यू झाला. पोलीसांवर हल्ला केलेल्या रामपाल व त्यांच्या भक्तांवर देशाविरुद्ध युद्ध छेडल्याचा सगळ्यात गंभीर गुन्हा पोलीसांनी दाखल केला आहे.
10 / 10
तथाकथित संत रामपाल - यांच्या अटकप्रकरणात धार्मिक बाबा आणि त्यांचे सशस्र भक्तगण किती धोकादायक बनतात आणि राज्य सरकार कोर्ट व पोलीसांनादेखील न जुमानता हजारो भक्तांच्या श्रद्धेच्या बळावर स्वत:ची संस्थानं कशी चालवतात हे समोर आलं आहे.