'या' शहरांमध्ये मिळतो सर्वात जास्त पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 03:51 PM2018-11-28T15:51:01+5:302018-11-28T15:56:06+5:30

भारतात कर्मचाऱ्यांना सगळ्यात जास्त पगार बंगळुरु, मुंबई आणि दिल्ली या शहारांमध्ये देण्यात येतो.

या शहरांमध्ये हार्डवेअर आणि नेटवर्किंग, सॉफ्टवेअर आणि आयटी सर्विस, ओल्ड फर्निचर ही तीन अशी क्षेत्र आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांना लठ्ठ पगार दिला जातो.

लिंक्डइनने सगळ्यात जास्त पगार देणाऱ्या शहरांचा सर्वे केला आहे. यामध्ये बंगळुरू हे पहिलं शहर आहे, जिथे कर्मचाऱ्यांना सगळ्यात जास्त पगार दिला जातो. बंगळुरू तांत्रिक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. त्यामुळे इथे जास्त पगार मिळतात.

बंगळुरूनंतर भारतातल्या मुंबई आणि दिल्ली या शहरांचा नंबर लागतो. मुंबई आणि दिल्लीमध्ये देखील आयटी आणि नेटवर्किंमधील कर्मचाऱ्यांना जास्त वेतन मिळते.

देशात हार्डवेअर किंवा नेटवर्किंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्व साधारणपणे वर्षाला 15 लाख रुपये पगार दिला जातो. तर सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 12 लाखांपर्यंत वर्षाला पगार मिळतो