'भारतरत्न' अब्दुल कलाम यांचे 10 विचार; जगण्याचा नवा मंत्र देणारे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 11:23 AM2019-07-27T11:23:42+5:302019-07-27T11:30:52+5:30

यशस्वी लोकांच्या किंवा त्यांच्या यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन कल्पना मिळतील.

काळा रंग अशुभ समजला जातो. पण काळ्या रंगाचाच फळा अनेक विद्यार्थांचे भविष्य उजळवतो.

अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधं आहेत.

आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, त्या तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणूनच, कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कणखर आहात.

शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.

झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्नं ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपूच देत नाही.

पावसात इतर पक्षी आपल्या संरक्षणासाठी आसरा शोधत असतात. गरूड मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्याही वर जाऊन उडत असतो. आपली समस्या एकच असते, फक्त दृष्टिकोन वेगळा असतो.

तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलतील.

तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका. कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात.

आकाशाकडे बघा, आपण एकटे अजिबात नाही. संपूर्ण ब्रम्हांड तुमचा मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देतं जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो.