काय सांगता! इथे भरवला जातो नवरींचा बाजार, पैसे देऊन पत्नी खरेदी करतात लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 17:32 IST2021-07-14T17:21:12+5:302021-07-14T17:32:48+5:30
असं म्हटलं जातं की, या समुदायातील मुलींनाही या परंपरेवरून खास काही आक्षेप नाही. कारण त्यांना सुरूवातीपासूनच यासाठी मानसिक रूपाने तयार केलं जातं.

प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की, त्यांच्या मुलीचं लग्न चांगल्या मुलासोबत मोठ्या धडाक्यात व्हावं. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक देश असाही आहे जिथे मुलींना लग्नासाठी बाजारात विकलं जातं? धक्का बसला ना?
आज आम्ही तुम्हाला त्या देशाबाबत सांगणार आहोत जिथे लग्नासाठी बाजारात मुलींवर बोली लावली जाते. इतकंच नाही तर मुलींचे आई-वडिलच त्यांना बाजारात घेऊन जातात.
इथे मुलींना त्यांचे आई-वडील नवरींच्या बाजारात घेऊन जातात. या मंडीमध्ये नवरींची खरेदी करणारे अनेक लोक येतात. ते बोली लावतात. जे सर्वात सर्वात जास्त बोली लावतात, आई-वडील आपल्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत ठरवतात.
बुल्गेरियाच्या स्तारा जागोर नावाच्या ठिकाणावर वर्षातून चार वेळा नवरींचा बाजार भरतो. इथे येणारे लग्नाळू मुले आपल्या आवडीच्या मुलीवर बोली लावून त्या मुलीला आपली पत्नी बनवू शकतात. एका रिपोर्टनुसार, या मुलींचं वय १३ ते २० वर्षे असतं.
नवरींचा बाजार कलाइदझी समाजाकडून लावला जातो आणि इथे बाहेरील व्यक्ती येऊन नवरी खरेदी करू शकत नाही. एका रिपोर्टनुसार, या समाजात सध्या साधारण १८ हजार लोक आहेत.
असं म्हटलं जातं की, या समुदायातील मुलींनाही या परंपरेवरून खास काही आक्षेप नाही. कारण त्यांना सुरूवातीपासूनच यासाठी मानसिक रूपाने तयार केलं जातं.
मीडिया रिपोर्टनुसार, या समुदायातील लोक आपल्या मुलींना १३-१४ वर्षानंतर शाळेतून काढतात. असं म्हटलं जातं की, इथे येणाऱ्या मुलींना घरकामे आली पाहिजेत आणि त्यांचं वयही कमी असलं पाहिजे. हेच कारण आहे की, इथे येणाऱ्या जास्तीत जास्त मुली अल्पवयीन असतात.
जेव्हा एखाद्या मुलाला मुलगी पसंत पडते त्यानंतर खरेदीची रक्कम ठरवली जाते. एका रिपोर्टनुसार या बाजारात मुलींवर ३०० ते ४०० डॉलर इतकी बोली लागते.
नवरीच्या बाजारात पोहोचण्यासाठी मुली अनेक दिवसांपासून तयारी सुरू करतात. जास्त पैसे मिळण्यासाठी त्यांचं सुंदर दिसणंही महत्वाचं असतं. त्यामुळे त्या चांगले कपडे आणि मेकअपसोबत बाजारात येतात.
बाजारात मुलगी पसंत आल्यवर मुलगा तिला आपली पत्नी मानतो. त्यानंतर दोघांचे आई-वडील लग्नासाठी तयार होणं गरजेचं असतं. दोन्हीकडील लोकांमध्ये बातचीत होते. त्यानंतर रक्कम ठरते आणि मग नातं ठरतं.