पहिलं लग्न मोडलं मग अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, आता 4 महिन्यांनी म्हणाली - 'माझं जीवन तर..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:30 IST2023-01-10T13:21:51+5:302023-01-10T13:30:41+5:30

South Actress Mahalakshmi Latest Post: साऊथमधील या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. आता महालक्ष्मीने लग्नाच्या 4 महिन्यांनंतर खुलासा केला आहे की, तिचं आयुष्य लग्नानंतर किती बदललं आहे.

South Actress Mahalakshmi Latest Post: अभिनेत्री महालक्ष्मी (Mahalakshmi) ने इन्स्टाग्रामवर तिचे पतीसोबतचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यात दोघांनी जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळाली. दोघेही बेस्ट कपल गोल्स देत आहेत. त्यांची केमिस्ट्री पाहून लोकही अवाक् झाले आहेत.

साऊथमधील या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. आता महालक्ष्मीने लग्नाच्या 4 महिन्यांनंतर खुलासा केला आहे की, तिचं आयुष्य लग्नानंतर किती बदललं आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलं की, 'आयुष्य फारच सुंदर आहे आणि तू सुद्धा'. या पोस्टसाठी तिने कमेंट्स हाइड केल्या आहेत.

महालक्ष्मीने प्रोड्यूसर रविंद्रसोबत लग्न केल्यावर ती फार ट्रोल झाली होती. लोकांनी तिच्यावर खूप टीका केली होती. प्रोड्यूसर रवींद्रसोबत तिचं हे दुसरं लग्न आहे. पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यावर तिने हे दुसरं लग्न केलं.

असं सांगितलं जातं की, पहिल्या पतीसोबत लग्न केल्यावर तिचे वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी वेगळे मार्ग निवडले होते. त्यानंतर रविंद्रच्या रूपात तिला नवीन जोडीदार मिळाला. आज ते सुखाने संसार करत आहेत. त्याच्या आयुष्यात येऊन ती आनंदी झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महालक्ष्मी आणि रविंद्रची भेट 'विदियुम वरई काथिरु' सिनेमा दरम्यान झाली होती. याच सिनेमाच्या सेटवर त्यांची जवळीक वाढली. आता महालक्ष्मीने त्याच्यासोबत लग्न स्वत:ला भाग्यशाली म्हटलं आहे.

महालक्ष्मी साऊथ टीवी सीरियल्समधीस पॉपुलर अभिनेत्री आहे. तिने 'ऑफिस', 'थिरु मंगलम', 'केलाडी कनमनी', 'यामिरुक्का बयामेन', 'अरसी', 'वाणी रानी' आणि 'चेल्लामय' सारख्या शोजमध्ये काम केलं आहे. तर रविंद्रने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.