५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:16 IST2025-06-02T15:13:17+5:302025-06-02T15:16:40+5:30

500 rupee note : आरबीआय खरोखरच ५०० रुपयांची नोट बंद करणार आहे का? जर ती बंद करणार असेल तर त्यामागील कारण काय असू शकते ते जाणून घेऊया?

गेल्या काही दिवसांपासून ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर याबद्दल अनेक बातम्या फिरत आहेत.

रिझर्व्ह बँकेने (RBI) ५०० रुपयांच्या नोटांबाबत अजून तरी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, पण तज्ज्ञांच्या मते या नोटा मार्च २०२६ पर्यंत बंद होऊ शकतात.

बँकिंग तज्ज्ञ अश्विनी राणा यांच्या मते, २००० च्या नोटांप्रमाणे अचानक बंद न करता, आरबीआय हळूहळू ५०० च्या नोटा बाजारातून काढून टाकेल.

५०० च्या नोटा कमी झाल्यावर, १०० आणि २०० रुपयांच्या नोटांचा वापर वाढवला जाईल. एटीएम आणि बँकांमध्ये या लहान नोटांची संख्या वाढवली जाईल.

सरकार आणि आरबीआयचा एक महत्त्वाचा उद्देश काळ्या पैशाला (Black Money) आळा घालणे हा आहे. आयकर छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ५०० च्या नोटा सापडत असल्याने हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर व्यवहारांमध्ये मोठ्या नोटांचा वापर जास्त होतो. त्यामुळे, ५०० च्या नोटा बंद करून भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो.

सरकार डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. मोठ्या नोटा कमी झाल्याने लोक UPI, कार्ड पेमेंट यांसारख्या डिजिटल पर्यायांकडे वळतील, ज्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल.

घाबरून जाण्याची गरज नाही. जर नोटा बंद झाल्या, तर तुम्हाला त्या बँकेत जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, जसे २००० च्या नोटांच्या बाबतीत झाले होते.