शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कर्ज घेण्यासाठी आता 'सिबिल'ची गरज नाही! वीज बिल आणि मोबाईल रिचार्जवरून ठरणार तुमची 'पत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:38 IST

1 / 10
आता बँकांकडून कर्ज घेण्यासाठी केवळ सिबिल स्कोरवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. सरकार एका नवीन क्रेडिट स्कोरिंग सिस्टमवर काम करत आहे.
2 / 10
नवीन व्यवस्थेत आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित फ्रेमवर्क वापरले जाईल. याद्वारे व्यक्तीचा कोणताही जुना कर्जाचा इतिहास नसला तरीही त्याची पत तपासली जाईल.
3 / 10
सध्या ज्यांनी कधीही कर्ज घेतलेले नाही, त्यांना बँका 'रिस्क' समजून कर्ज नाकारतात. ही अडचण दूर करण्यासाठी सरकार ही पावले उचलत आहे.
4 / 10
एआय मॉडेल केवळ कर्जाचा रेकॉर्ड न पाहता, व्यक्तीचे वीज-पाणी बिल भरण्याची नियमितता, मोबाईल रिचार्ज आणि डिजिटल व्यवहारांचा कल तपासेल.
5 / 10
तुमच्या बँक खात्यातील पैशांची ये-जा आणि सरकारी योजनांचा घेतलेला लाभ यावरून तुमचे एक 'वैकल्पिक क्रेडिट प्रोफाइल' तयार केले जाईल.
6 / 10
ज्या महिलांकडे उत्पन्नाचा स्रोत आहे पण स्वतःच्या नावावर कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नाही, अशा महिलांना आणि स्वयंसाहाय्यता गटांना या सुविधेमुळे सहज कर्ज उपलब्ध होईल.
7 / 10
ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक आणि शेतकरी, जे औपचारिक बँकिंग व्यवस्थेपासून दूर होते, त्यांना या नवीन व्यवस्थेमुळे बँकिंग मुख्य प्रवाहात सामील करून घेता येईल.
8 / 10
सर्वांना बँकिंग सुविधा मिळवून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यामुळे बँकांसाठीही आपला ग्राहकवर्ग वाढवण्याची मोठी संधी निर्माण होईल.
9 / 10
ही प्रणाली राबवताना लोकांच्या खासगी माहितीची सुरक्षा राखणे हे सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील.
10 / 10
ही प्रणाली राबवताना लोकांच्या खासगी माहितीची सुरक्षा राखणे हे सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सFarmerशेतकरी