दुर्दैवी ! बहिणीकडून राखी बांधून परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 19:20 IST2021-08-23T19:20:24+5:302021-08-23T19:20:57+5:30
रक्षाबंधनाच्या दिवशीचा मोरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळ्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दुर्दैवी ! बहिणीकडून राखी बांधून परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू
मानवत ( परभणी ) : बहिणीकडून राखी बांधून परताना ट्रकच्या मागील चाकाखाली दुचाकी आल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी ( दि. 22 )रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. भागवत विष्णू मोरे असे मृताचे नाव आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीचा मोरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळ्याने हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील मानोली येथील भागवत विष्णू मोरे (21) आणि त्याचा चुलत भाऊ माउली सतीश मोरे (10 ) रक्षाबंधनासाठी बहिणीकडे दुचाकीवरून मोरेगाव येथे गेले होते. रात्री मानोलीकडे परत येत असताना मानवतरोड येथे रेल्वे फाटकाजवळ रस्त्यावरील खड्ड्यांचा भागवतला अंदाज आला नाही. यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या ( क्रमांक MH 21 डी 8515 ) मागील चाकाखाली त्यांची दुचाकी आली. यात भागवत जागीच ठार झाला. तर माऊलीला सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच स पो नि भारत जाधव, बीट जमादार प्रताप साळवणे, हनुमान पावडे, यांनी घटना स्थळी दाखल झाले. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पो नि सुभाष राठोड यांनी दिली.