शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

विद्युत वाहिन्यांच्या घर्षणातून ठिणगी पडल्याने दोन एकर ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 1:21 PM

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून दुष्काळात आर्थिक संकट ओढवले आहे. 

पालम (परभणी ) : तालुक्यातील आरखेड शिवारात वीजतारा एकमेकांना स्पर्श होऊन दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (दि.28) सकाळी नऊ वाजता घडली. यामुळे शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून दुष्काळात आर्थिक संकट ओढवले आहे. 

आरखेड शिवारात सखाराम नरहरी दुधाटे व दत्ता सखाराम दुधाटे यांच्या कुटुंबाची शेतजमीन आहे. या शेतजमिनीमध्ये दोन एकरात त्यांनी उसाची लागवड केली होती. ऊसावर खत व मशागतीसाठी त्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला. तसेच दुष्काळ असतानाही विकतचे पाणी घेऊन पिक जगवले.  आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतातून लोंबकळत गेलेल्या विद्युत वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी पडली. शेतातील पाचट यामुळे पेटली, काही वेळातच आग संपूर्ण शेतात पसरली. ऊस जळल्याने शेतकऱ्याचे जवळपास २ लाखांचे नुकसान झाले आहे. दुष्काळात मेहनत पूर्वक पोसलेले पिक हातचे गेल्याने शेतकरी व्यथित झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षाने हे संकट ओढवले असल्याचा आरोप करत  तातडीने उसाचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :fireआगparabhaniपरभणीFarmerशेतकरी