शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत चेंगराचेंगरीमुळे गेला ३१ जणांचा जीव, अभिनेत्याला पाहण्याचा नादात मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
5
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
6
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
7
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
8
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
9
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
10
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
11
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
12
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
13
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
14
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
15
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
16
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
17
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
18
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
19
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
20
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक, विविध मागण्यांसाठी पाथरीत केला रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 18:55 IST

आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. परंतु, अठरा मागण्या मार्गी झाल्याशिवाय माघार नाही

पाथरी ( परभणी ) : येथील  रेणुका शुगर्स साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात यावी , कारखाना परिसरातील व पाथरी उपविभागातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याची हमी द्यावी या व इतर अठरा मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभा यांच्या नेतृत्वात आज दुपारी पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात अडीच तास रास्ता रोकोआंदोलन  करण्यात आले आंदोलना  यावेळी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक खोळंबली  .

ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेच्या वतीने पाथरी शहरातील सेलु कॉर्नर येथे गुरुवार 30 डिसेंबर रोजी तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन  करण्यात आले  .प्रारंभी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर शेतकऱ्यांनी मोर्चाला सुरुवात केली .हा मोर्चा घोषणाबाजी करत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सेलु कॉर्नर येथेत आला होता .याठिकाणी शेतकऱ्यांनी अडीच तास ठिय्या करत वाहतूक अडवून धरली होती. 

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कॉम्रेड राजन शिरसागर ,कॉम्रेड शिवाजी कदम ,कॉम्रेड विजयसिंह कोल्हे ,ज्येष्ठ शेतकरी नेते विश्वनाथ थोरे ,कॉम्रेड नवनाथ कोल्हे आदींनी मार्गदर्शन केले .दरम्यान ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांना ठोस आश्वासन दिल्याशिवाय या ठिकाणावरून न उठण्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली होती. या ठिकाणी सुरु असलेले आंदोलन थांबविण्यात यावे यासाठी पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण मध्यस्थी करत होते. दरम्यान, सहकार आयुक्त, अपर जिल्हाधिकारी यांनी साखर आयुक्त यांच्या मार्फत मंत्रालयात श्री रेणुका शुगर साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवणे संदर्भात प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्या संदर्भात आश्वासन दिल्यानंतर कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका घेतली .यावेळी नायब तहसीलदार एस .बी . कट्टे यांच्यामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सहकार मंत्री , साखर आयुक्त व परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले ..आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती .आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती.   मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. परंतु, अठरा मागण्या मार्गी न लागल्यास पुढील आंदोलन हे जेलभरो आंदोलन असेल.- कॉम्रेड राजन क्षीरसागर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी