शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

सुरक्षित प्रवासाचे स्टेअरिंगच खिळखिळे; बसचा कधी दरवाजा तर कधी चाके निखळतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 19:00 IST

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नादुरुस्त बसमुळे प्रवाशांची गैरसोय 

- संतोष मगरपरभणी : जिल्ह्यातील चारही आगारांत एसटी महामंडळाच्या बहुतांश बस नादुरुस्त आहेत. कधी स्टेअरिंग जाम तर, कधी चाक निखळण्याच्या घटना पुढे आल्याने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. ‘एसटीचा प्रवास, सुखी प्रवास’ अशी अपेक्षा फोल ठरत आहे. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध योजना असल्याने प्रतिसाद मिळतोय. मात्र नादुरूस्त बस आणि नियोजनाच्या अभावामुळे ९ ऑगस्टला गंगाखेडहून पालमला जाणाऱ्या बसचे चाक निखळून पडले होते. या घटनेत ६२ प्रवासी बचावले. यापूर्वी पूर्णा तालुक्यातही अशाच प्रकारची घटना घडली. यातही प्रवासी बचावले होते. १९ मार्चला सायाळा पाटीवर स्टेअरिंग तुटल्याने बस पलटल्याची झाली होती. काही दिवसांपूर्वी राणीसावरगाव येथे चाक निखळले होते. चालकाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला होता. बसचा कुठे दरवाजा निखळतो तर, कुठे ब्रेक फेल. यासह नादुरुस्त बस धावत असल्याने प्रवाशांना  अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो.   

फिटनेस सर्टिफिकेटवरही प्रश्नचिन्हबस नादुरुस्त असताना या बसेसना रस्त्यावर धावण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भंगार गाड्यांकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सध्या वाढत आहे. अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नादुरुस्त बसवर तसे शिक्कामोर्तब करणे टाळणे आवश्यक आहे.

सर्वाधिक घटना गंगाखेड आगारातील गंगाखेड येथील आगरातील बसच्या बिघाडात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. बसचा पाटा निखळून पडणे, पंक्चर होणे, स्टेअरिंग जाम होणे, स्टेअरिंग तुटणे, ब्रेकफेल होणे, इंजिनमध्ये बिघाड होणे अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढल्याने बस प्रवास धोकादायक बनला आहे. यासह अनेक तांत्रिक बिघाड होणे नित्याचेच झाले असल्याची स्थिती आहे. प्रवासात रस्त्यातच बस बंद पडल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

अपघातास कारणीभूत कोणवाहन चालवताना चालकाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ड्यूटीवर चढण्यापूर्वी चालक-वाहकाची तपासणी केली जाते. तसेच बस मार्गस्थ करण्यापूर्वी दुरुस्त आहे की, नाही याबाबतही तपासणी केली जाते. मग अपघात झाल्यास यात जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुरुस्तीवर लाखोंचा खर्च तरीही...जिल्ह्यातील चारही आगारांतील बस दुरुस्तीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. बसकडे लक्ष दिले जात असल्याचे महामंडळाकडून  सांगण्यात येते. वास्तवात मात्र, बस रस्त्यावर धावताना असे प्रकार घडतात. प्रवाशांची सुरक्षितता महामंडळाकडून नेहमीच लक्षात घेतली जाते. मात्र, अशा घटना होऊ नये याकरिता सर्व आगारांना सूचना दिल्या आहेत. अशा घटना घडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. - प्रवीण शिंदे, उपयंत्र अभियंता

टॅग्स :Accidentअपघातtourismपर्यटनstate transportएसटीparabhaniपरभणी