शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

सुरक्षित प्रवासाचे स्टेअरिंगच खिळखिळे; बसचा कधी दरवाजा तर कधी चाके निखळतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 19:00 IST

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नादुरुस्त बसमुळे प्रवाशांची गैरसोय 

- संतोष मगरपरभणी : जिल्ह्यातील चारही आगारांत एसटी महामंडळाच्या बहुतांश बस नादुरुस्त आहेत. कधी स्टेअरिंग जाम तर, कधी चाक निखळण्याच्या घटना पुढे आल्याने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. ‘एसटीचा प्रवास, सुखी प्रवास’ अशी अपेक्षा फोल ठरत आहे. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध योजना असल्याने प्रतिसाद मिळतोय. मात्र नादुरूस्त बस आणि नियोजनाच्या अभावामुळे ९ ऑगस्टला गंगाखेडहून पालमला जाणाऱ्या बसचे चाक निखळून पडले होते. या घटनेत ६२ प्रवासी बचावले. यापूर्वी पूर्णा तालुक्यातही अशाच प्रकारची घटना घडली. यातही प्रवासी बचावले होते. १९ मार्चला सायाळा पाटीवर स्टेअरिंग तुटल्याने बस पलटल्याची झाली होती. काही दिवसांपूर्वी राणीसावरगाव येथे चाक निखळले होते. चालकाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला होता. बसचा कुठे दरवाजा निखळतो तर, कुठे ब्रेक फेल. यासह नादुरुस्त बस धावत असल्याने प्रवाशांना  अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो.   

फिटनेस सर्टिफिकेटवरही प्रश्नचिन्हबस नादुरुस्त असताना या बसेसना रस्त्यावर धावण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भंगार गाड्यांकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सध्या वाढत आहे. अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नादुरुस्त बसवर तसे शिक्कामोर्तब करणे टाळणे आवश्यक आहे.

सर्वाधिक घटना गंगाखेड आगारातील गंगाखेड येथील आगरातील बसच्या बिघाडात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. बसचा पाटा निखळून पडणे, पंक्चर होणे, स्टेअरिंग जाम होणे, स्टेअरिंग तुटणे, ब्रेकफेल होणे, इंजिनमध्ये बिघाड होणे अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढल्याने बस प्रवास धोकादायक बनला आहे. यासह अनेक तांत्रिक बिघाड होणे नित्याचेच झाले असल्याची स्थिती आहे. प्रवासात रस्त्यातच बस बंद पडल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

अपघातास कारणीभूत कोणवाहन चालवताना चालकाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ड्यूटीवर चढण्यापूर्वी चालक-वाहकाची तपासणी केली जाते. तसेच बस मार्गस्थ करण्यापूर्वी दुरुस्त आहे की, नाही याबाबतही तपासणी केली जाते. मग अपघात झाल्यास यात जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुरुस्तीवर लाखोंचा खर्च तरीही...जिल्ह्यातील चारही आगारांतील बस दुरुस्तीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. बसकडे लक्ष दिले जात असल्याचे महामंडळाकडून  सांगण्यात येते. वास्तवात मात्र, बस रस्त्यावर धावताना असे प्रकार घडतात. प्रवाशांची सुरक्षितता महामंडळाकडून नेहमीच लक्षात घेतली जाते. मात्र, अशा घटना होऊ नये याकरिता सर्व आगारांना सूचना दिल्या आहेत. अशा घटना घडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. - प्रवीण शिंदे, उपयंत्र अभियंता

टॅग्स :Accidentअपघातtourismपर्यटनstate transportएसटीparabhaniपरभणी