शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

अग्रीमच्या रकमेला राज्याचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST

परभणी : पावसाने खंड दिल्याने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीने २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले ...

परभणी : पावसाने खंड दिल्याने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीने २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले खरे; मात्र राज्य शासनाने ही रक्कम विमा कंपनीला दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार झाला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने शेतकरी पिकांचा विमा उतरवितात. मात्र विमा कंपनीकडून विमा परतावा देताना आढेवेढे घेतले जात असल्याचा प्रकार आता नेहमीचाच झाला आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाने ताण दिला. पिके ऐन वाढीच्या अवस्थेत असताना २१ दिवस पाऊस लांबला. त्यामुळे अनेक भागात पिके करपून गेली.

जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची पाहणी केल्यानंतर २३ मंडळातील सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ५० ते ५८ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर या २३ मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम रिलायन्स विमा कंपनीने द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

या आदेशांमुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. मात्र हे आदेश काढून पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अग्रीम रक्कम देण्यासाठी कोणत्याच हालचाली होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने विमा कंपनीकडे रक्कम अदा केल्यानंतरच शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम अदा केली जाते. मात्र राज्याने अद्याप ही रक्कम विमा कंपनीला अदा केली नाही, परिणामी कंपनीनेही अग्रीम रक्कम देण्यास चालढकलपणा सुरू केला आहे. त्यामुळे अग्रीम रकमेचे आदेश निघूनही शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

६ लाख शेतकऱ्यांनी भरला होता विमा

जिल्ह्यात ६ लाख २१ हजार ४१२ शेतकऱ्यांनी रिलायन्स विमा कंपनीकडे शेती पिकांचा विमा उतरविला आहे. एकूण ३ लाख ६१ हजार ७२८ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित करण्यात आली आहेत. सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचे संरक्षित क्षेत्र सर्वाधिक आहे. पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे २३ मंडळातील शेतकरी पीक विमा कंपनीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.