शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

अग्रीमच्या रकमेला राज्याचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST

परभणी : पावसाने खंड दिल्याने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीने २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले ...

परभणी : पावसाने खंड दिल्याने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीने २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले खरे; मात्र राज्य शासनाने ही रक्कम विमा कंपनीला दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार झाला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने शेतकरी पिकांचा विमा उतरवितात. मात्र विमा कंपनीकडून विमा परतावा देताना आढेवेढे घेतले जात असल्याचा प्रकार आता नेहमीचाच झाला आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाने ताण दिला. पिके ऐन वाढीच्या अवस्थेत असताना २१ दिवस पाऊस लांबला. त्यामुळे अनेक भागात पिके करपून गेली.

जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची पाहणी केल्यानंतर २३ मंडळातील सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ५० ते ५८ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर या २३ मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम रिलायन्स विमा कंपनीने द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

या आदेशांमुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. मात्र हे आदेश काढून पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अग्रीम रक्कम देण्यासाठी कोणत्याच हालचाली होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने विमा कंपनीकडे रक्कम अदा केल्यानंतरच शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम अदा केली जाते. मात्र राज्याने अद्याप ही रक्कम विमा कंपनीला अदा केली नाही, परिणामी कंपनीनेही अग्रीम रक्कम देण्यास चालढकलपणा सुरू केला आहे. त्यामुळे अग्रीम रकमेचे आदेश निघूनही शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

६ लाख शेतकऱ्यांनी भरला होता विमा

जिल्ह्यात ६ लाख २१ हजार ४१२ शेतकऱ्यांनी रिलायन्स विमा कंपनीकडे शेती पिकांचा विमा उतरविला आहे. एकूण ३ लाख ६१ हजार ७२८ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित करण्यात आली आहेत. सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचे संरक्षित क्षेत्र सर्वाधिक आहे. पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे २३ मंडळातील शेतकरी पीक विमा कंपनीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.