शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST

परभणी : जिल्ह्यातील कापूस हंगाम सुरू झाला असून, महाराष्ट्र कापूस फेडरेशनने तीन तालुक्यांत सुरू केलेल्या केंद्रांवर २४ दिवसांत ६ ...

परभणी : जिल्ह्यातील कापूस हंगाम सुरू झाला असून, महाराष्ट्र कापूस फेडरेशनने तीन तालुक्यांत सुरू केलेल्या केंद्रांवर २४ दिवसांत ६ हजार ४३१ शेतकऱ्यांचा १ लाख ९७ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने नगदी पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. अतिवृष्टीच्या तडाख्यातून बचावलेल्या कापसाची वेचणी करण्यात आली. अनेक भागांत पहिल्याच वेचणीत कापसाचा झाडा झाल्याच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेत पुन्हा फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र कापूस फेडरेशनने ३ डिसेंबरपासून जिल्ह्यात कापूस खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे. बाजार समितीच्या माध्यमातून ही खरेदी केली जात आहे. कापूस खरेदी करताना गोंधळ होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना मोबाइलवर संदेश पाठविल्यानंतरच कापूस खरेदी केली जात आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्रावरील वाहनांची गर्दीही नियंत्रणात आली आहे.

३ डिसेंबरपासून जिल्ह्यात प्रत्यक्ष कापूस खरेदी सुरू करण्यात आली. परभणी, गंगाखेड आणि पाथरी या तीन केंद्रांवर आतापर्यंत १ लाख ९७ हजार ८०० क्विंटल कापूस खरेदी झाला आहे, अशी माहिती फेडरेशनच्या वतीने देण्यात आली.

केंद्रांची संख्या आणखी वाढवणार

जिल्ह्यात सध्या तीन केंद्रांवरच कापूस खरेदी केला जात आहे. उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन सोमवारपासून सोनपेठ तालुक्यातील करम येथील कापूस खरेदी केंद्रावर खरेदी सुरू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवारपासून गंगाखेड येथे आणखी दोन केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे कापूस खरेदी आणखी वेगाने होईल, असे कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक ए.डी. रेणके यांनी सांगितले.

११२ कोटींचा कापूस खरेदी

जिल्ह्यात आतापर्यंत कापूस फेडरेशनने सुमारे २ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. खरेदी केलेल्या कापसाला प्रति क्विंटल ५७०० रुपये भाव दिला जात आहे. याप्रमाणे एकूण ११२ कोटी ७४ लाख ६० हजार रुपयांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे.

खरेदीसाठी वाढविणार शेतकऱ्यांची संख्या

सध्या तीन केंद्रांवर ८५० शेतकऱ्यांना कापूस घालण्यासाठी एस.एम.एस.द्वारे बोलावले जात आहे. दिवसभरात या उत्पादकांचा कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे एकही वाहन केंद्रावर मुक्कामी थांबत नाही. सोमवारपासून दररोज १ हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाणार असून, मंगळवारपासून ही संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे.

-ए.डी. रेणके,

प्रभारी व्यवस्थाक, कापूस पणन महासंघ