शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

परभणी : लघुतलावाचे पाणीही आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:45 AM

पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस वाढत चालल्याने पाणीसाठा उपलब्ध असलेल्या लघुतलावातील पाणीही आता पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता एकाही तलावातून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त पाण्याचा उपसा करता येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस वाढत चालल्याने पाणीसाठा उपलब्ध असलेल्या लघुतलावातील पाणीही आता पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता एकाही तलावातून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त पाण्याचा उपसा करता येणार नाही.यावर्षी सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यातच परतीचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे यावर्षी प्रथमच आॅक्टोबर महिन्यापासून पाणी टंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नसला तरी थोड्याफार प्रमाणात पाणी शिल्लक आहे. जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यातच टंचाई निवारणाची बैठक घेऊन मोठ्या शहरांच्या पाणी पुरवठा योजनांना जुलै महिन्यापर्यंत लागणारे पाणी आरक्षित केले आहे. येलदरी, निम्न दुधना या प्रकल्पांसह करपरा, मासोळी या मध्यम प्रकल्पातील पाणी आॅक्टोबर महिन्यातच शहरी भागाच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेण्यात आले आहे. या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या योजना उपलब्ध पाण्यावर चालविल्या जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रकल्पातील सर्वच्या सर्व पाणीसाठा पिण्यासाठी पूर्वीपासूनच राखीव आहे; परंतु, लघु प्रकल्पांमधील पाण्याचे आरक्षण अद्यापपर्यंत करण्यात आले नव्हते. त्यामुळे या प्रकल्पांमधून अवैधरीत्या पाण्याचा उपसा केला जात होता. सध्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन लघु प्रकल्पातील पाणीही जिल्ह्यातील टंचाई काळात पिण्यासाठी वापरता येणे शक्य आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने लघु प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणीसाठाही पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.तीन तलावांत पाणीसाठा उपलब्धजिल्ह्यातील मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांबरोबरच तीन लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात पाथरी तालुक्यातील झरी, जिंतूर तालुक्यातील मांडवी आणि पालम तालुक्यातील तांदूळवाडी या तलावांचा समावेश आहे. मात्र या तलावांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित नसल्याने या पाण्याचा सर्रास उपसा होत होता. त्यामुळे हा उपसा थांबवितानाही प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत असे. पिण्यासाठी पाणी आरक्षित केल्यानंतर ग्रामपंचायतींना या पाण्याची रक्कम पाटबंधारे विभागाकडे अदा करावी लागते. ती टाळण्यासाठी आरक्षण केले जात नव्हते; परंतु, तलावांमधील पाण्याचा उपसा होत असल्याने जिल्हाधिकाºयांनी आदेश काढून पाणी आरक्षित करण्याचे सुचविले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई