शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

परभणीतील प्रकार : पाण्याअभावी २० नेत्र शस्त्रक्रिया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:06 IST

शहरातील मुख्य नेत्र रुग्णालयात पाणी नसल्याने २० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया रद्द करण्याचा प्रकार बुधवारी घडला असून या प्रकाराबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांना ना खंत ना गांभीर्य वाटत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील मुख्य नेत्र रुग्णालयात पाणी नसल्याने २० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया रद्द करण्याचा प्रकार बुधवारी घडला असून या प्रकाराबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांना ना खंत ना गांभीर्य वाटत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार गेल्या अनेक काही महिन्यांपासून ढेपाळला आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी असलेल्या विविध यंत्र सामुग्री बंद असल्याने त्यांना खाजगी ठिकाणाहून सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एक्स-रे आदी काढून आणावे लागत आहेत. शिवाय काही औषधीही खाजगी दुकानातूनच आणाव्या लागत आहेत. यासंदर्भात सातत्याने ओरड होत असताना वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत आणि लोकप्रतिनिधीही पाहण्यास तयार नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या गैरसोयीचा कळस बुधवारी नेत्र रुग्णालयातही गाठला गेला. शहरातील शनिवार बाजार भागात स्वतंत्ररित्या नेत्र रुग्णालय कार्यरत आहे. या नेत्र रुग्णालयात बुधवारी शस्त्रक्रियेसाठी २० रुग्णांना येण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध भागातून हे रुग्ण सकाळपासूनच शस्त्रक्रियेसाठी आले होते; परंतु, रुग्णालयात पाणीच नव्हते. त्यामुळे अधिकारीही फिरकले नाहीत. परिणामी येथील वैद्यकीय अधिकाºयांच्या कक्षाला कुलूप दिसून आले. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांनी वैद्यकीय अधिकारी आता येतील, थोड्या वेळाने येतील म्हणून प्रतीक्षा केली; परंतु, कोणीही येत नसल्याने काही रुग्णांच्या नातेवाईकांनी संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, शहराध्यक्ष अरुण पवार, जनहित मदत केंद्राचे कुणाल गायकवाड, प्रेम आवचार यांना फोन केला. त्यानंतर ते दुपारी १ वाजेच्या सुमारास या रुग्णालयात आले. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांकडे चौकशी केली असता नेत्र रुग्णालयात महानगरपालिकेकडून पाणी उपलब्ध करुन देण्यात आले नसल्याने बुधवारच्या शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर शिंदे यांनी मनपातील पाणीपुरवठा विभागातील कर्मचाºयांशी संपर्क साधला असता या विभागाचे कर्मचारी हरकळ यांनी नेत्र रुग्णालयाकडून पाण्याचे बिल मनपाला दिले जात नाही. यापूर्वीचेही बिल थकित आहे. जोपर्यंत नेत्र रुग्णालयातून पावती दिली जाणार नाही, तोपर्यंत पाण्याचे टँकर पाठवू नका, अशा लेखी सूचना नेत्र रुग्णालयातील अधिकाºयांनीच मनपाला दिल्या आहेत. बुधवारी टँकर हवे, अशी कोणतीही पावती मनपाकडे आली नाही. त्यामुळे बुधवारी पाण्याचे टँकर पाठविले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयातील अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी या संदर्भात ‘लोकमत’कडे तक्रार केली. त्यानंतर सदर प्रतिनिधीने नेत्र रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून आले.यावेळी उपस्थित पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील रुग्ण मंदुबाई आश्रोबा वाघमारे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मी सकाळपासूनच शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आले आहे; परंतु, डॉक्टरच आले नाहीत, असे सांगितले. तर परभणीतील मुन्नाबी शेख नूर यांनीही शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात हजर झाले; परंतु, डॉक्टर आले नसल्याचे सांगितले. पालम तालुक्यातील चाटोरी येथील विश्वनाथ श्रीरंग गव्हाणे यांनीही यावेळी या रुग्णालयाची तक्रार केली.दरम्यान, वैद्यकीय अधिकाºयाची बराचवेळ वाट पाहिल्यानंतर ते येणार नसल्याची खात्री झाल्यानंतर दुपारनंतर हे रुग्ण निघून गेले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. वरिष्ठांचे लक्ष नाही. त्यामुळेच येथील अधिकारी बेजबाबदार झाल्याचा आरोप संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी केला आहे.नेत्र रुग्णांची सातत्याने हेळसांडशहरातील शनिवार बाजार भागात नेत्र रुग्णालय आहे. नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या रुग्णांना विविध तपासण्या करण्यासाठी दूर अंतरावरील जिल्हा रुग्णालयात जावे लागते.४ दोन ते तीन वेळा त्यांच्या यासाठी चकरा होतात. यातून त्यांची बरीच हेळसांड होते. शिवाय वैद्यकीय अधिकारी अनेक वेळा उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे रुग्णांना अनेक वेळा परत जावे लागते, अशी प्रतिक्रिया येथील रुग्णांनी दिली.नेत्ररोग तज्ज्ञ अर्चना गोरे यांचा प्रतिसाद नाहीया संदर्भात नेत्र रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.अर्चना गोरे यांच्याशी दिवसभरात तीन वेळा मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पुन्हा चौथ्यांदा फोन केल्यानंतर त्यांनी मोबाईल घेतला; परंतु, या विषयासंदर्भात काहीही प्रतिक्रिया न देता फोन कट केला. त्यामुळे त्यांची या संदर्भातील भूमिका समजू शकली नाही.रुग्णांवर गुरुवारी शस्त्रक्रिया होणार - डाके४या संदर्भात प्रतिक्रियेसाठी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बुधवारच्या शस्त्रक्रिया पाणी नसल्याने रद्द झाल्या असून त्या गुरुवारी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटलWaterपाणी