शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

परभणी : ६४० ग्रा.पं.ची लेखा परीक्षणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:24 IST

आर्थिक वर्षात झालेल्या खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या लेखापरीक्षणाकडे तब्बल ६४० ग्रामपंचायतींनी पाठ फिरविल्यामुळे या ग्रामपंचातींमध्ये झालेल्या खर्चाविषयी जिल्हा प्रशासनच अनभिज्ञ राहत आहे. लेखापरीक्षण न करणाºया ग्रामपंचायतीवर कठोर कारवाई होत नसल्याने लेखापरीक्षणाकडे दुर्लक्ष करणाºया ग्रामपंचायतींची संख्या वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आर्थिक वर्षात झालेल्या खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या लेखापरीक्षणाकडे तब्बल ६४० ग्रामपंचायतींनी पाठ फिरविल्यामुळे या ग्रामपंचातींमध्ये झालेल्या खर्चाविषयी जिल्हा प्रशासनच अनभिज्ञ राहत आहे. लेखापरीक्षण न करणाºया ग्रामपंचायतीवर कठोर कारवाई होत नसल्याने लेखापरीक्षणाकडे दुर्लक्ष करणाºया ग्रामपंचायतींची संख्या वाढत आहे.प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतींना राज्य आणि केंद्र शासनाचे अनुदान प्राप्त होते. या अनुदानातून ग्रामपंचायतस्तरावर विकासकामे केली जातात. त्यामुळे आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या अनुदानासह इतर रक्कमांचा अहवाल त्याचवर्षी जिल्हा परिषद प्रशासनाला सादर करावयाचा असतो. यासाठी ग्रामपंचायतींना दरवर्षी लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. परभणी जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायती असून सर्व ग्रामपंचायतींचे वेळेत लेखापरीक्षण दाखल झाले असते तर ग्रामीण भागातील विकासकामांसाठी मिळालेला निधी आणि त्यावर झालेला खर्च या बाबींचा एकत्रित ताळमेळ घालता आला असता. परंतु, जि.प. प्रशासनासह ग्रामपंचायतस्तरावरुनही लेखा परीक्षणासाठी उदासिनता असल्याने हे लेखापरीक्षण वेळेत होत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. यावर्षीही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यापासून आर्थिक वर्ष सुरु होत असले तरी ग्रामपंचायतींना जून महिन्यापर्यंत लेखापरीक्षण सादर करण्याची मुभा दिली आहे. यासाठी विशेष लेखापरीक्षकांचीही नियुक्ती केली जाते. परभणी जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी ६४ ग्रामपंचायतींनी ४ जूनपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखापरीक्षणाचे अहवाल सादर केले आहेत. त्यात मानवत तालुक्यातील ५, सेलू तालुक्यातील १०, पाथरी तालुक्यातील ८, गंगाखेड तालुक्यातील १३, पालम तालुक्यातील १४ आणि सोनपेठ तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनी मात्र अजूनही हे अहवाल सादर केले नाहीत.कारवाई नसल्याने वाढली उदासिनतालेखापरीक्षण सादर न करणाºया ग्रामपंचायतीवर कडक कारवाई होत नसल्याने लेखापरीक्षण करण्यास ग्रामपंचायती उदासीन असल्याचे दिसते. अनेक ग्रामपंचायतींचे तर ८ ते १० वर्षांपासूनचे लेखापरीक्षण झाले नाहीत. तसेच लेखापरीक्षणाचा कालावधी जेवढा वाढेल, तेवढी जुनी कागदपत्रे जमा करण्यास विलंब होऊन लेखापरीक्षणात अनियमितता होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक वर्षी लेखापरीक्षण करणे बंधनकारक करुन असे लेखापरीक्षण न करणाºया ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.३० जूनपर्यंतची ग्रा.पं.ना मुदतआर्थिक वर्षातील लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यासाठी ग्रामपंचायतींना ३० जूनपर्यंतची मुदत आहे. आणखी २५ दिवस ग्रामपंचायतींकडे शिल्लक असून या काळात किती ग्रामपंचायती लेखापरीक्षण करतात, याकडे लक्ष लागले आहे. काही ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण सुरु असेल, काहींनी पंचायत समितीकडे विशेष लेखापरीक्षण विभागामध्ये आपले दस्ताऐवज दाखलही केले असतील. त्यामुळे ३० जूनपर्यंत लेखापरीक्षण करणाºया ग्रामपंचायतींची संख्या वाढणार असली तरी मागील काही वर्षापासून लेखापरीक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.निधी वाढल्याने लेखा परीक्षण आवश्यकमागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतींच्या अधिकारामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा निधी आता थेट ग्रामपंचायतींना मिळू लागला आहे. १४ व्या वित्त आयोगातूनही मोठा निधी ग्रा.पं.स्तरापर्यंत येत असल्याने या निधीतून विकासकामे होतात का? याची माहितीही उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षणाला जि.प.ने महत्त्व द्यायची गरज आहे.तीन तालुके निरंकचग्रामपंचायतीच्या लेखा परीक्षणामध्ये तीन तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये काही ग्रामपंचायतींनी लेखापरीक्षण करुन घेतले असले तरी परभणी, जिंतूर आणि पूर्णा या तीन तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीने लेखापरीक्षण केले नाही. त्यामुळे तिन्ही तालुक्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना अधिक कडक भूमिका घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRegistrarकुलसचिवgram panchayatग्राम पंचायत