शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

परभणी : दुष्काळी यादीत आणखी दहा मंडळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:13 IST

जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी २४ मंडळांमध्ये यापूर्वीच गंभीरस्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला असून, पाऊस आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता आणखी दहा मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती नाजूक झाल्याने या मंडळांचाही गंभीर दुष्काळाच्या यादीत समावेश करावा, असा विनंतीवजा अहवाल जिल्हा प्रशसनाने शासनाकडे पाठविला असून या दहा पैकी सात मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी २४ मंडळांमध्ये यापूर्वीच गंभीरस्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला असून, पाऊस आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता आणखी दहा मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती नाजूक झाल्याने या मंडळांचाही गंभीर दुष्काळाच्या यादीत समावेश करावा, असा विनंतीवजा अहवाल जिल्हा प्रशसनाने शासनाकडे पाठविला असून या दहा पैकी सात मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.यंदा परतीचा पाऊस झाला नसल्याने जिल्हाभरात परिस्थिती गंभीर झाली आहे. प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. याशिवाय रबी पेरण्या झाल्या नाहीत आणि खरीप हंगामातही नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत होती. राज्य शासनाने यावर्षी दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलले आहेत.या निकषानुसार पहिल्या टप्प्यात पावसाच्या सरासरीवर आधारित जिल्ह्यातील चार तालुके गंभीर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग केल्यानंतर जाहीर केलेल्या गंभीर दुष्काळाच्या यादीत सहा तालुक्यांचा समावेश झाला. मात्र गंगाखेड, पूर्णा आणि जिंतूर या तालुक्यांचा समावेश झाला नाही.राज्य शासनाने तालुकानिहाय पावसाचाच विचार करुन दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केली. त्यात तीन तालुक्यांचा समावेश झाला नाही. मात्र मंडळ निहाय विचार करता दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यातील अनेक मंडळांमध्येही गंभीर स्वरुपाची परिस्थिती आहे. या मंडळांमध्येही कमी पाऊस झाला असून, पिकांचे उत्पादनही झाले नाही. त्यामुळे मंडळांचा विचार करता आणखी दहा मंडळे दुष्काळी यादीत समाविष्ट होणे अपेक्षित आहे. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या सहा तालुक्यातील २४ मंडळांचा दुष्काळाच्या यादीत समावेश आहे. मात्र, उर्वरित तीन तालुक्यांपैकी गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यातील दहा मंडळांमध्येही पावसाचे प्रमाण कमी असून, या मंडळांचाही दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करावा, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे. त्यामुळे आता या मंडळांविषयी काय निर्णय होतो, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.जिंतूर, गंगाखेडमध्ये परिस्थिती नाजूकच४जिंतूर अणि गंगाखेड या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पिकांची वाढ व्यवस्थित झाली नसल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांप्रमाणेच या दोन्ही तालुक्यातील परिस्थिती असून, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगामात पाऊस कमी झाल्याने व जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रबी ज्वारी व इतर पिकांची कमी प्रमाणात पेरणी झाली अूसन, येणाºया काळात चाºयाची कमतरता भासू शकते. या शिवाय या दोन्ही तालुक्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. तेव्हा गंगाखेड व जिंतूर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.या मंडळांचा पाठविला अहवाल४गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यातील दहा मंडळांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविल आहे. त्यानुसार गंगाखेड मंडळात ७८.५ टक्के, राणीसावरगाव मंडळात ५०.३६, माखणी ५३़२३, महातपुरी ५९़२५, जिंतूर ६९़६१, सावंगी म्हाळसा ८३़७१, बोरी ५५़४४, चारठाणा ४७़६८, आडगाव ३८़४४ आणि बामणी मंडळात ७९़०९ टक्के पाऊस झाला आहे़ तेव्हा या मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, असा अहवाल पाठविण्यात आला आहे़ या दहा मंडळांपैकी गंगाखेड, सावंगी म्हाळसा आणि बामणी या तीन मंडळांतील पावसाची टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने हे मंडळ वगळता उर्वरित ७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर होवू शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळFarmerशेतकरी