शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

परभणी : रेल्वे फाटकावर एसटी बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:34 AM

शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर आगाराची नांंदेडकडे जाणारी बस (क्रमांक एम.एच.२०-बी.एल.०१३२) दुपारी बारा वाजेच्या सुमारास गंगाखेड बसस्थानकातून पालम, लोहा व नांदेड येथे जाणारे ५८ प्र्रवासी घेऊन निघाली असता बसस्थनकाजवळ असलेला पालम नाका रेल्वेफाटक आदिलाबाद-परळी या रेल्वेची वेळ झाल्याने फाटक बंद होते. त्यामुळे बस फाटक परिसरात थांबली होती. यावेळी फाटकाच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या रांगातून बस बाहेर काढताना मधेच येत असलेल्या दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रेल्वेफाटकाच्या बाजूला असलेल्या लोखंडी कठड्यांकडे वाहकाच्या बाजूने झुकली. वेळीच सावध चालकाने लोखंडी कठडे तोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात बस पलटी होऊ नये याची दक्षता घेत बस पुढे नेली. वाहकाच्या बाजूने बस घासत शेवटपर्यंत गेली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांची एकच धांदल उडाली. प्रसंगावधान राखत बसचालक शेख नजीर व वाहक रुख्मिणी केकान यांनी बस तेथून बाहेर काढून नांदेड रोडवरील दत्त मंदिर परिसरात रस्त्याच्या बाजूला बस थांबवून बसची पाहणी केली. यामध्ये बसचे नुकसान होऊन बस खिळखीळी झाल्याने नांदेडकडे जाणाऱ्या दुसºया बसने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे बसमधून प्रवास करणाºया पासधारक व ५५ प्रवाशांबरोबरच स्टाफचे तीन प्रवासी तसेच चालक, वाहक यांचा जीव भांड्यात पडला.बस अपघातातून सुखरूप बाहेर पडल्याचे पाहून सर्वांच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.दुतर्फा बेशिस्त लागलेल्या वाहनांमुळे अपघातपालम नाक्यावर असलेल्या रेल्वेफाटकावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावरील वाहने वळण रस्त्याने पालम रस्त्यावर काढण्यात आली आहेत. यातच येथील रस्ता पूर्णत: खड्डेयुक्त झाल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार दिवसातून २५ ते ३० वेळा फाटक बंद होत आहे. यातच पुढे जाण्याची घाई करीत दुचाकीचालक, आॅटोचालक व छोटे वाहनधारक आपली वाहने बेशिस्तपणे रस्त्यावर दुतर्फा लावली जात असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात