शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

परभणी : खडकपूर्णा काही भरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:59 IST

येलदरी धरणाच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण झाल्यापासून येलदरी धरण एकदा पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदा तर केवळ ९ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न तीव्र बनला आहे़

विजय चोरडिया ।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : येलदरी धरणाच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण झाल्यापासून येलदरी धरण एकदा पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदा तर केवळ ९ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न तीव्र बनला आहे़पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात २००९ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण बांधण्यात आले आहे़ तेव्हापासून २०१३ हे वर्ष वगळता एकदाही येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही़ या धरणावर ६० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे़ त्यामुळे मागील आठ वर्षांत या भागातील शेतकरी पाण्याअभावी आर्थिक संकटात सापडला आहे़यावर्षी धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा आहे़ यात गाळ किती व पाणी किती हे सांगणेही कठीण आहे़ दहा वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाने गाळाचे सर्वेक्षण केले होते़ त्यावेळी १४ टक्के गाळ असल्याचे स्पष्ट झाले़ आता हे प्रमाण १८ टक्क्यांपेक्षा जास्त झाले असावे़ करपरा या मध्यम प्रकल्पात ७६ टक्के पाणीसाठा आहे़ प्रकल्पाची क्षमता कमी असल्याने तो किती दिवस पुरेल हेही सांगता येत नाही़या दोन मध्यम प्रकल्पांसह पाटबंधारे विभागाच्या कवडा लघु तलावात ५२ टक्के, भोसी लघुतलावात ८ टक्के, मांडवी लघु तलावात ८० टक्के, दहेगाव लघुतलाव १५ टक्के, केहाळ लघु तलाव २१ टक्के, आडगाव लघुतलाव १७ टक्के, चिंचोली लघुतलाव १६ टक्के, देवगाव लघुतलाव ५७ टक्के, जोगवाडा लघु तलाव ९० टक्के, चारठाणा लघु तलाव ८३ टक्के तसेच पाडळी लघु तलावात ५५ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे़ खडकपूर्णा धरणात यावर्षी शून्य टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असून, सिद्धेश्वर धरणात २५ टक्के पाणीसाठा आहे़ निसर्गाने यावर्षी पाठ फिरवल्याने भविष्यात तीव्र जलसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे़५ शहरे व २०० : गावांचा पाणीप्रश्न गंभीरयेलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावर जिंतूर, हिंगोली, वसमत, पूर्णा व परभणी ही पाच प्रमुख शहरे अवलंबून आहेत़ याशिवाय पिंपळगाव २३ गाव पाणीपुरवठा योजना, १२ गाव वस्सा पाणीपुरवठा योजना, २० गाव पुरजळ पाणीपुरवठा योजना या प्रमुख योजनांसह येलदरी नदी काठावरील ३५ गावे, सिद्धेश्वर धरणाजवळील २० ते २५ गावे असे २०० पेक्षा जास्त गावांमध्ये परतीचा पाऊस पूर्ण क्षमतेने झाला नाही तर तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे़ विशेष म्हणजे, या दोन्ही धरण क्षेत्राखाली येणारी हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यापासून वंचित राहणार आहे़येलदरी धरणात उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी पिण्याच्या पाण्यासाठी साठा आरक्षित करून शिल्लक पाणी राहिल्यास सिंचनासाठी सोडता येईल़ यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणीkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर