शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

परभणी : खडकपूर्णा काही भरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:59 IST

येलदरी धरणाच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण झाल्यापासून येलदरी धरण एकदा पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदा तर केवळ ९ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न तीव्र बनला आहे़

विजय चोरडिया ।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : येलदरी धरणाच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण झाल्यापासून येलदरी धरण एकदा पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदा तर केवळ ९ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न तीव्र बनला आहे़पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात २००९ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण बांधण्यात आले आहे़ तेव्हापासून २०१३ हे वर्ष वगळता एकदाही येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही़ या धरणावर ६० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे़ त्यामुळे मागील आठ वर्षांत या भागातील शेतकरी पाण्याअभावी आर्थिक संकटात सापडला आहे़यावर्षी धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा आहे़ यात गाळ किती व पाणी किती हे सांगणेही कठीण आहे़ दहा वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाने गाळाचे सर्वेक्षण केले होते़ त्यावेळी १४ टक्के गाळ असल्याचे स्पष्ट झाले़ आता हे प्रमाण १८ टक्क्यांपेक्षा जास्त झाले असावे़ करपरा या मध्यम प्रकल्पात ७६ टक्के पाणीसाठा आहे़ प्रकल्पाची क्षमता कमी असल्याने तो किती दिवस पुरेल हेही सांगता येत नाही़या दोन मध्यम प्रकल्पांसह पाटबंधारे विभागाच्या कवडा लघु तलावात ५२ टक्के, भोसी लघुतलावात ८ टक्के, मांडवी लघु तलावात ८० टक्के, दहेगाव लघुतलाव १५ टक्के, केहाळ लघु तलाव २१ टक्के, आडगाव लघुतलाव १७ टक्के, चिंचोली लघुतलाव १६ टक्के, देवगाव लघुतलाव ५७ टक्के, जोगवाडा लघु तलाव ९० टक्के, चारठाणा लघु तलाव ८३ टक्के तसेच पाडळी लघु तलावात ५५ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे़ खडकपूर्णा धरणात यावर्षी शून्य टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असून, सिद्धेश्वर धरणात २५ टक्के पाणीसाठा आहे़ निसर्गाने यावर्षी पाठ फिरवल्याने भविष्यात तीव्र जलसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे़५ शहरे व २०० : गावांचा पाणीप्रश्न गंभीरयेलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावर जिंतूर, हिंगोली, वसमत, पूर्णा व परभणी ही पाच प्रमुख शहरे अवलंबून आहेत़ याशिवाय पिंपळगाव २३ गाव पाणीपुरवठा योजना, १२ गाव वस्सा पाणीपुरवठा योजना, २० गाव पुरजळ पाणीपुरवठा योजना या प्रमुख योजनांसह येलदरी नदी काठावरील ३५ गावे, सिद्धेश्वर धरणाजवळील २० ते २५ गावे असे २०० पेक्षा जास्त गावांमध्ये परतीचा पाऊस पूर्ण क्षमतेने झाला नाही तर तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे़ विशेष म्हणजे, या दोन्ही धरण क्षेत्राखाली येणारी हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यापासून वंचित राहणार आहे़येलदरी धरणात उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी पिण्याच्या पाण्यासाठी साठा आरक्षित करून शिल्लक पाणी राहिल्यास सिंचनासाठी सोडता येईल़ यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणीkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर