शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

परभणी : खडकपूर्णा काही भरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:59 IST

येलदरी धरणाच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण झाल्यापासून येलदरी धरण एकदा पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदा तर केवळ ९ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न तीव्र बनला आहे़

विजय चोरडिया ।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : येलदरी धरणाच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण झाल्यापासून येलदरी धरण एकदा पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदा तर केवळ ९ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न तीव्र बनला आहे़पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात २००९ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण बांधण्यात आले आहे़ तेव्हापासून २०१३ हे वर्ष वगळता एकदाही येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही़ या धरणावर ६० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे़ त्यामुळे मागील आठ वर्षांत या भागातील शेतकरी पाण्याअभावी आर्थिक संकटात सापडला आहे़यावर्षी धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा आहे़ यात गाळ किती व पाणी किती हे सांगणेही कठीण आहे़ दहा वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाने गाळाचे सर्वेक्षण केले होते़ त्यावेळी १४ टक्के गाळ असल्याचे स्पष्ट झाले़ आता हे प्रमाण १८ टक्क्यांपेक्षा जास्त झाले असावे़ करपरा या मध्यम प्रकल्पात ७६ टक्के पाणीसाठा आहे़ प्रकल्पाची क्षमता कमी असल्याने तो किती दिवस पुरेल हेही सांगता येत नाही़या दोन मध्यम प्रकल्पांसह पाटबंधारे विभागाच्या कवडा लघु तलावात ५२ टक्के, भोसी लघुतलावात ८ टक्के, मांडवी लघु तलावात ८० टक्के, दहेगाव लघुतलाव १५ टक्के, केहाळ लघु तलाव २१ टक्के, आडगाव लघुतलाव १७ टक्के, चिंचोली लघुतलाव १६ टक्के, देवगाव लघुतलाव ५७ टक्के, जोगवाडा लघु तलाव ९० टक्के, चारठाणा लघु तलाव ८३ टक्के तसेच पाडळी लघु तलावात ५५ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे़ खडकपूर्णा धरणात यावर्षी शून्य टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असून, सिद्धेश्वर धरणात २५ टक्के पाणीसाठा आहे़ निसर्गाने यावर्षी पाठ फिरवल्याने भविष्यात तीव्र जलसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे़५ शहरे व २०० : गावांचा पाणीप्रश्न गंभीरयेलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावर जिंतूर, हिंगोली, वसमत, पूर्णा व परभणी ही पाच प्रमुख शहरे अवलंबून आहेत़ याशिवाय पिंपळगाव २३ गाव पाणीपुरवठा योजना, १२ गाव वस्सा पाणीपुरवठा योजना, २० गाव पुरजळ पाणीपुरवठा योजना या प्रमुख योजनांसह येलदरी नदी काठावरील ३५ गावे, सिद्धेश्वर धरणाजवळील २० ते २५ गावे असे २०० पेक्षा जास्त गावांमध्ये परतीचा पाऊस पूर्ण क्षमतेने झाला नाही तर तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे़ विशेष म्हणजे, या दोन्ही धरण क्षेत्राखाली येणारी हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यापासून वंचित राहणार आहे़येलदरी धरणात उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी पिण्याच्या पाण्यासाठी साठा आरक्षित करून शिल्लक पाणी राहिल्यास सिंचनासाठी सोडता येईल़ यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणीkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर