शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

परभणीचा प्रश्न गंभीर : २५ दिवसांचेच पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:53 PM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील बंधाºयात केवळ २५ दिवसांचेच पाणी शिल्लक असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे़ या नियोजनावर १७ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाºया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील बंधाºयात केवळ २५ दिवसांचेच पाणी शिल्लक असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे़ या नियोजनावर १७ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाºया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयामध्ये पाणी संपत आले आहे़ सध्या या बंधाºयात केवळ २५ ते ३० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे़ बंधाºयातील उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस पुरविण्यासाठी प्रशासनाला कडक उपाययोजना कराव्या लागणार आहेत़ जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईचे संकट आतापासूनच गंभीर होत चालले आहे़ पुढील वर्षातील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी वापरावे लागणार असल्याने आतापासूनच पाणी आरक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक झाली़ या बैठकीत महानगरपालिका प्रशासनाने परभणी शहरासाठी पुढील वर्षातील जुलै महिन्यापर्यंत ८ दलघमी पाणी लागेल, असा अहवाल दिला आहे़ परभणी शहराला येलदरी येथील धरणातून पाणी घेतले जाते़ येलदरी प्रकल्पात पाणीसाठा जमा झाला नसल्याने दोन वर्षांपासून येलदरी प्रकल्पातून राहटी बंधाºयासाठी पाणी मिळत नाही़ परिणामी शहरवासियांना निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घ्यावे लागते़ मात्र यावर्षी निम्न दूधना प्रकल्पातही पुरेसा पाणीसाठा नसल्याने या प्रकल्पातून किती पाणी मिळते? यावरच परभणीकरांच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे़ दरम्यान, महानगरपालिकेने केलेल्या नियोजनानुसार येलदरी प्रकल्पातून चार पाणी पाळ्या आणि निम्न दूधना प्रकल्पातून दोन पाणी पाळ्या घेण्याचे निश्चित केले आहे़ हा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला असून, बुधवारी मुंबई येथे पाणी आरक्षणाच्या संदर्भात आयोजित बैठकीत या आरक्षणाला मंजुरी मिळणार आहे़ राहटी येथील बंधाºयाची पाणी साठवण क्षमता १़५२ दलघमी एवढी आहे़ एक पाणी पाळी घेतल्यानंतर शहरवासियांना ४५ दिवस हे पाणी पुरते़ साधारणत: ८ दलघमी पाणी शहराला लागणार आहे़असे करावे : लागेल आरक्षणजुलै महिन्यापर्यंत परभणी शहराला ८ दलघमी पाणी लागणार आहे़ राहटी बंधाºयात ८ दलघमी पाणी घेण्यासाठी प्रत्यक्षात प्रकल्पांमध्ये तिप्पट पाण्याचे आरक्षण करावे लागते़ परभणी शहराला येलदरी धरणातून पाण्याचे आरक्षण केल्यास येलदरी धरणाचे पाणी सिद्धेश्वर धरणात सोडले जाते़ सिद्धेश्वरपासून राहटी बंधारा ४७ किमी अंतरावर आहे़ प्रत्येक पाणी पाळीच्या वेळी १ दलघमी पाणी घेतले जाते़ हे पाणी बंधाºयात पोहचण्यासाठी प्रकल्पातून किमान ५ ते ७ दलघमी पाणी सोडावे लागते़ तसेच निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घेण्यासाठीही आरक्षित पाण्याच्या तुलनेत तीनपट अधिक पाणी नदीपात्रात सोडावे लागते़ निम्न दूधना प्रकल्पापासून राहटी बंधारा ६५ किमी अंतरावर असून, या अंतरानुसार आरक्षित पाणी देण्यासाठी त्या पटीने नदीपात्रात पाणी सोडावे लागते़बंधाºयाच्या प्लेट बदलणारराहटी बंधाºयाच्या निर्मितीपासून आजपर्यंत प्लेट बदलल्या नाहीत़ त्यामुळे जुन्या झालेल्या या प्लेटमधून पाण्याची गळती होत असल्याने नवीन प्लेट टाकण्याचे नियोजन वसमत येथील पूर्णा पाटबंधारे विभागाने तयार केले आहे़ सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा संपल्यानंतर बंधाºयाच्या प्लेट बदलण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मिळाली़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण