शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

परभणी : विमा रकमेसाठी केवळ आश्वासनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:46 IST

२०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी भरलेला विमा मिळावा, यासाठी शेतकºयांनी व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ दिवस व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ६ दिवस त्याच बरोबर जिल्हाबंद, मोर्चे व केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मदत देण्याची मागणी केली; परंतु, अद्यापपर्यंत वंचित शेतकºयांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नसल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: २०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी भरलेला विमा मिळावा, यासाठी शेतकºयांनी व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ दिवस व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ६ दिवस त्याच बरोबर जिल्हाबंद, मोर्चे व केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मदत देण्याची मागणी केली; परंतु, अद्यापपर्यंत वंचित शेतकºयांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नसल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी जिल्ह्यातील ६ लाख ९७ हजार ७१७ शेतकºयांनी ३१ कोटी ५८ लाख ९८ हजार रुपयांचा पीक विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्सकडे काढला होता; परंतु, शेतकºयांना पीक विमा मंजूर करताना राज्य शासनाने केंद्र शासनाचे नियम बदलून विमा कंपनीला फायदा पोहचविण्यासाठी महसूल मंडळ व गाव घटक ग्राह्य न धरता तालुका घटक ग्रहित धरला. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी पात्र असूनही या पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहिले. विशेष म्हणजे या संदर्भातील पीक कापणी प्रयोग, पंचनामे आदीमध्ये महसूल, जिल्हा परिषद, कृषी विभागाच्या अधिकाºयांनी गंभीर चुका केल्या. याचा लाभ रिलायन्स कंपनीला झाला. तर शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी जून महिन्यात तब्बल २३ दिवस जिल्हा कचेरीसमोर आंदोलन केले. मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले. त्यांच्याकडून वंचित शेतकºयांना न्याय दिला जाईल, असे आश्वासनही मिळाले. या आंदोलनादरम्यान विविध राजकीय पक्ष व संघटनांनी जिल्हाबंद, रास्तारोको, जिल्हा कचेरीत ठिय्या आंदोलन केले होते. महिनाभरानंतर या प्रक्रियेत प्रशासकीय पातळीवरुन काय हालचाली झाल्या, याबाबतची माहिती रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने घेतली. त्यानंतर ४१ कोटींची मदत जिल्ह्यातील काही महसूल मंडळातील शेतकºयांना देण्यात आली. आंदोलनापूर्वी १०६ कोटी ११ लाख ७१ हजार रुपयांचा पीक विमा ३ लाख ३१ हजार ७८८ शेतकºयांना मिळाला होता. त्यानंतर आणखी जवळपास २५० कोटी रुपयांचा पीक विमा ३० दिवसांत मिळणे अपेक्षित होते; परंतु, त्यानंतर कंपनीने १८ आॅगस्ट २० कोटी ९६ लाख व त्यानंतर आतापर्यंत २१ कोटी रुपयांचीच रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांना वर्ग केली. यामध्ये पालम तालुक्यातील बनवस, चाटोरी, पालम, सेलू तालुक्यातील चिकलठाणा, देऊळगाव गात, कुपटा, सेलू, वालूर, सोनपेठ तालुक्यातील आवलगाव, सोनपेठ या महसूल मंडळातील काही शेतकºयांना लाभ मिळाला. उर्वरित महसूल मंडळांतील शेतकºयांना मात्र अद्यापपर्यंत तरी लाभ देण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यात आंदोलने करुनही लाभ मिळत नसल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने २९ आॅक्टोबर पासून सलग सहा दिवस औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण सुरु केले. या आंदोलनानंतर मागण्यांचा सकारात्मक विचार करुन न्याय दिला जाईल, असे आश्वासन पुन्हा एकदा मिळाले. परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय ते केंद्रीय कृषीमंत्र्यांपर्यंत जिल्ह्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींनी २०१७-१८ च्या खरीप हंगामामधील पिके संरक्षित केलेल्या शेतकºयांना विम्याची रक्कम देण्यात यावी, यासाठी पाठपुरावा केला; परंतु, एक ते सव्वा वर्षाचा कालावधी उलटला तरी या शेतकºयांना मदत देण्यात आलेली नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाcollectorजिल्हाधिकारी