शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

परभणी: एकाही प्रकल्पात शिल्लक नाही पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:15 AM

जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाण्याचा साठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा होण्यासाठी या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे. सध्या तरी सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाण्याचा साठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा होण्यासाठी या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे. सध्या तरी सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत.दोन वर्षापासून पाऊस सरासरी देखील गाठत नाही. त्याचा परिणाम पिकांच्या उत्पन्नावर तर होतच आहे. या शिवाय जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणीपातळीतही सातत्याने घट होत आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के पाऊस कमी झाला. विशेष म्हणजे परतीचा पाऊस झाला नाही. परिणामी परभणी जिल्ह्यात प्रकल्पांची स्थिती नाजूक झाली आहे. जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना या दोन प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा भार आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्पात जेमतेम ९ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पामध्ये ४७ टक्क्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक होता. सहा महिन्यांच्या काळात या दोन्ही प्रकल्पांमधील संपूर्ण पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्यात आला. मागील वर्षीच्या आॅक्टोबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. या आरक्षणानुसार जून महिन्यापर्यंत परभणी जिल्ह्यातील शहरी भागाला पाणी उपलब्ध झाले आहे.सद्यस्थितीला पावसाळा सुरु झाला असला तरी प्रकल्पांमध्ये मात्र पाणीसाठा शिल्लक नाही. ९३४ दलघमी क्षमतेच्या येलदरी प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसून या प्रकल्पात मृतसाठ्यात पाणीसाठा आहे. तर सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प ३४४.८०० दलघमी क्षमतेचा असून या प्रकल्पामध्येही उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय करपरा मध्यम प्रकल्प, मासोळी मध्यम प्रकल्प, डिग्रस, मुद्गल, ढालेगाव, मुळी या गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्येही पाणीसाठा शिल्लक नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात हे सर्व प्रकल्प पाण्याने भरले तरच पुढील वर्षीच्या उन्हाळ्याची चिंता मिटणार आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असून मान्सूनचा एक हलका पाऊसही जिल्ह्याता झाला आहे. मात्र ६ महिन्यांपासून जिल्ह्यातील जमीन तापलेली असून भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे शनिवारी झालेल्या पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहिले नाही. सध्या शेतकऱ्यांना पेरण्यासाठी तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे.निम्न दुधनाच्या पाण्याने जिल्ह्याला तारले४यावर्षी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने पाणीटंचाई अधिकच गंभीर झाली होती. निम्न दुधना प्रकल्पातच बºयापैकी पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पाचे पाणी परभणी, पूर्णा, सेलू या तीन शहरांसह तीनही तालुक्यांमधील अनेक गावांसाठी वापरण्यात आले. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाचा या तालुक्यांना हातभार लागला.४आ.डॉ.राहुल पाटील यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. परिणामी अनेक गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न मिटला. आता या प्रकल्पातही पाणीसाठा शिल्लक नसून पावसाळ्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.मृतसाठ्यात उपलब्ध पाणी४जिल्ह्यातील एकाही प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. सर्वच्या सर्व प्रकल्प मृतसाठ्यात आहेत.४येलदरी प्रकल्पाच्या मृतसाठ्यात ९१.६२३ दलघमी, निम्न दुधना प्रकल्पात ५५.१९ दलघमी, करपरा मध्यम प्रकल्पात १.५७ दलघमी तर मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये १.७५ दलघमी पाणी मृतसाठ्यात शिल्लक आहे. इतर चारही बंधारे, झरीचा तलाव आणि २२ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी