शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

परभणी महापालिका: टंचाई निवारणासाठी पंधरा कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:12 AM

शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.शहर पाणीपुरवठा योजने संदर्भात शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर, आयुक्त रमेश पवार, सभागृह नेते भगवान वाघमारे, शहर अभियंता वसीम पठाण आदींची उपस्थिती होती. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी येलदरी ते धर्मापुरी अशी ५५ कि.मी.ची जलवाहिनी टाकली आहे. यासाठी १ कोटी २५ लाख लिटर क्षमतेचे स्टोरेज बांधण्यात आले आहे. धर्मापुरी परिसरात दोन जलशुद्धीकरण केंद्रातून खाजा कॉलनी येथील जलकुंभात पाणी आणले जाणार आहे. या ठिकाणाहून नवीन जलवाहिनी उड्डाणपूल मार्गे शिवाजी महाराज यांचा पुतळा ते राहाटी बंधाऱ्यापर्यंत १५ कि.मी. अंतराची जलवाहिनी टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १५ कोटी रुपये खर्च येणार असून दोन दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या तातडीच्या पाणीपुरवठा योजनेच्या बैठकीत ही माहिती दिली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे, अशी माहिती रमेश पवार यांनी दिली. सध्या राहाटी बंधाºयात सिद्धेश्वर धरणातून पाणी घेतले जाते. एका पाणीपाळीसाठी ४ ते ५ घनमीटर पाणी लागते. नवीन प्रस्तावित जलवाहिनी टाकली तर पाण्याचा अपव्यय टळणार असल्याचेही आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई