शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

परभणी : तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात भुरभूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:03 IST

शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला आहे़ रविवारी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक भागामध्ये रिमझिम पाऊस झाला आहे़ या पावसाने खरिप पिकांना दिलासा मिळाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला आहे़ रविवारी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक भागामध्ये रिमझिम पाऊस झाला आहे़ या पावसाने खरिप पिकांना दिलासा मिळाला आहे़दीड महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली़ जिल्हाभरात सर्वदूर भीज पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत़ शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस रिमझिम पावसामुळे प्रथमच पावसाळी वातावरण जिल्हावासियांना अनुभवायास मिळाले़ या पावसामुळे कापूस, सोयाबीन या पिकांना दिलासा मिळाला आहे़ दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने ही पिके माना टाकत होती़ऐनवेळी पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे़ रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १२़९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ पाथरी तालुक्यात सर्वाधिक २५ मिमी, मानवत तालुक्यात २३़३३ मिमी, परभणी १४़५०, सेलू १४़८०, पूर्णा १३, पालम ८, सोनपेठ ६़५०, गंगाखेड ५़७५ आणि जिंतूर तालुक्यात ५़६७ मिमी पाऊस झाला आहे़१ जूनपासून आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या प्रमाणात केवळ ५५ टक्के पाऊस झाला आहे़ मानवत तालुक्यात सर्वाधिक ६९़२ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ २२ टक्के पाऊस झाला आहे़ मानवत तालुक्यात सर्वाधिक २७़७ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.पिके तगली; पाण्याचा प्रश्न कायम४जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना काही दिवसांपुरता दिलासा मिळाला आहे़ या पावसाने खरीप पिकांच्या उत्पादनात थोडीफार भर पडेलही़ परंतु, जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही़४धरणामध्ये पाणीसाठा होईल, असा पाऊस झाला नाही़ परभणी जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ आजपर्यंत झालेल्या पावसामुळे या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नसल्याने पाण्याचा प्रश्न कायम आहे़ जिल्हावासियांना आगामी उन्हाळ्यातील पाण्याची चिंता लागलेली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी