शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परभणी: पाथरी तालुक्यात हळदीच्या उताऱ्यात मोठ्या प्रमाणात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:33 AM

सातत्याने बोंडअळीचा प्रादूर्भाव सहन करणाºया कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पर्याय म्हणून हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्याने हळद पिकाला तालुक्यात उतारा कमी येऊ लागला आहे. त्यातच खर्च जास्त आणि उत्पन्नात घट, अशी अवस्था झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): सातत्याने बोंडअळीचा प्रादूर्भाव सहन करणाºया कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पर्याय म्हणून हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्याने हळद पिकाला तालुक्यात उतारा कमी येऊ लागला आहे. त्यातच खर्च जास्त आणि उत्पन्नात घट, अशी अवस्था झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.कापसाचे भांडार समजल्या जाणाºया पाथरी तालुक्यात मागील वर्षापासून कापसावर गुलाबी बोंडअळीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस उत्पादनात मोठी घट होऊन लागवडीचा खर्च ही निघणे अवघड झाले. त्याच बरोबर सोयाबीनला ही पाहिजे तसा उतारा येत नसल्याने आता तालुक्यातील अनेक शेतकरी निरोगी उत्पादनाची हमी असणाºयांना हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत.यावर्षी ही मोठ्या प्रमाणात हळद लागवड करण्यात आली आहे; परंतु, पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने हळदीच्या उत्पादनात मोठी घट दिसून येऊ लागली आहे.तालुक्यात सध्या हळद काढणी सुरू आहे. मात्र उतारा घटल्याने हळद लागवड करणारे पाथरी तालुक्यातील बहुतांश शेतकरी अडचणीत सापडले आहेत.दुष्काळामुळे ५० टक्के उत्पादन घटलेएका एकरमध्ये पिकातून जवळपास ८० ते ९० क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित असते. १०० क्विंटल ओल्या हळदीमधून २० ते २५ क्विंटल पक्की हळद तयार होते; परंतु, यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे हळदीच्या उताºयात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.सध्या हळद काढणी सुरू असून एका एकरमध्ये केवळ ५० ते ५५ क्विंंटल हळद उत्पादनाचा उतारा येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या दुष्काळामुळे उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ