शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

परभणी : दुर्लक्षामुळेच बनावट खतांची फसवेगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:16 IST

शहर परिसरातील खानापूर शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बनावट खत व शेती उपयोगी औषधींचा साठा जप्त करण्याची कारवाई केली असली तरी ज्या कृषी विभागावर हा सर्व प्रकार रोखण्याची जबाबदारी आहे तो कृषी विभाग चक्क साखर झोपेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ या संदर्भात तपासणी करण्यासाठी या विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा असतानाही या विभागाने त्याकडे कानाडोळा केल्याने कृषी विभागाच्या आशीर्वादानेच जिल्ह्यात बनावट खताचा लबाडीचा धंदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहर परिसरातील खानापूर शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बनावट खत व शेती उपयोगी औषधींचा साठा जप्त करण्याची कारवाई केली असली तरी ज्या कृषी विभागावर हा सर्व प्रकार रोखण्याची जबाबदारी आहे तो कृषी विभाग चक्क साखर झोपेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ या संदर्भात तपासणी करण्यासाठी या विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा असतानाही या विभागाने त्याकडे कानाडोळा केल्याने कृषी विभागाच्या आशीर्वादानेच जिल्ह्यात बनावट खताचा लबाडीचा धंदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे़परभणी जिल्ह्यामध्ये २ हजार २४८ कृषी दुकानांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री केली जाते़ या दुकानांतून शेतकºयांना मिळणारा माल हा शुद्ध व चांगल्या प्रतीचा आहे का? हे तपासण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे़ यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षण व जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालय कार्यरत आहे़ या अंतर्गत जिल्ह्यामध्ये १३ तपासणी अधिकारी आहेत़ यामध्ये ९ तालुका कृषी अधिकारी, एक उपविभागीय कृषी अधिकारी व एक तंत्र अधिकाºयाचा समावेश आहे़ खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री करणाºया २ हजार २४८ दुकानांची तपासणी करणे आवश्यक आहे; परंतु, यातील फक्त ६४० दुकानांचीच तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये किटक नाशकांची ७८४ पैकी ७९ दुकाने तपासण्यात आली़ तर खतांच्या ७२५ पैकी १४० दुकानांची तपासणी करण्यात आली़ त्याचबरोरबर ७३९ बियाणे विक्री करणाºया दुकानांपैकी ४२१ दुकानांची तपासणी करण्यात आली़ १३ अधिकाºयांचा लवाजमा उपलब्ध असतानाही १ हजार ६०८ दुकानांची तपासणी करण्याची तसदी या अधिकाºयांना घ्यावीशी वाटली नाही़ या संदर्भात जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सामाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वर्षभरात सर्व दुकाने तपासण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले; परंतु, कृषी निविष्ठांची तपासणी खरीप व रबी हंगामाच्या प्रारंभीच होणे आवश्यक आहे़ कारण त्याचवेळेला बळीराजा आपल्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ मिळावे, यासाठीची स्वप्ने पाहून कृषी निविष्ठांची खरेदी करीत असतो़ याची जाण मात्र अधिकाºयांना नसल्याचे दिसून येते़विशेष म्हणजे ज्या ६४० दुकानातील नमुन्यांची तपासणी करण्यात आली़ त्यातील फक्त २१ नमुने काढून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले़ प्रयोगशाळेने या नमुन्यांबाबत काय अहवाल दिला हे मात्र कृषी विभागाचे अधिकारी आणि तपासणी करणाºया प्रयोगशाळेतील अधिकाºयांनाच माहित आहे़ एकीकडे शेतकºयांना देण्यात येणाºया कृषी निविष्ठांची व्यवस्थित तपासणी होत नसताना दुसरीकडे शेतकºयांना देण्यात येणारी बियाणे, खते, किटकनाशके कोणती आहेत? ती कशी हाताळावी याचे प्रशिक्षण शेतकºयांना देणे गरजेचे होते; परंतु, काही मोजक्याच शेतकºयांना याचे प्रशिक्षण देऊन कृषी विभागाने हातवर केले आहेत़ त्याचबरोबर जिल्ह्याच्या कानाकोपºयामध्ये कुठे बनावट खत, औषधी तयार करण्याची कारखाने आहेत का? याचा तपास करून शोध घेणे गरजेचे असताना जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी असा कोणताच शोध घेतला नाही़ अखेर २१ जुलै रोजी परभणी शहरातील खानापूर ते पिंगळी रस्त्यावर कॅनॉलच्या पुढे एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट खत, औषधी तयार करणाºया कारखान्याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या पथकाने पर्दाफाश केला़ त्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांना या कारखान्याची कानकून लागली़ त्यानंतर धावत जाऊन शनिवारी पहाटे ६ वाजेपर्यंत त्या कारखान्याचा पंचनामा करण्यात आला. या सर्व प्रकरणात कृषी विभागाची निष्क्रियता बनावट कृषी निविष्ठा तयार करणाºयांच्या पथ्थावर पडल्याचे दिसून येत आहे.२९ लाखांची बनावट खत, औषधी जप्तदरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी शहरातील खानापूर शिवारातील गोदामात टाकलेल्या धाडीत जप्त केलेली बनावट खते, किटकनाशके आदींची मोजदाद शनिवारी पूर्ण झाली़ त्यानुसार २८ लाख ७६ हजार ९१० रुपयांचा बनावट कृषी निविष्ठांचा साठा आढळून आल्याचे स्पष्ट झाले़ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांना पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले होते़ त्यांनी याबाबतची पाहणी केली़ त्यानंतर या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनिल गोपिनवार यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत़ या प्रकरणी एक महिला व पुरुष अशा दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ शेतकºयांनी खते, किटकनाशके व अन्य शेती उपयोगी औषधी खरेदी करीत असताना ती अधिकृत असल्याची खात्री करूनच खरेदी करावीत़ संशयास्पद कृषी निविष्ठा आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीParbhani policeपरभणी पोलीस