शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

परभणी : दुर्लक्षामुळेच बनावट खतांची फसवेगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:16 IST

शहर परिसरातील खानापूर शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बनावट खत व शेती उपयोगी औषधींचा साठा जप्त करण्याची कारवाई केली असली तरी ज्या कृषी विभागावर हा सर्व प्रकार रोखण्याची जबाबदारी आहे तो कृषी विभाग चक्क साखर झोपेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ या संदर्भात तपासणी करण्यासाठी या विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा असतानाही या विभागाने त्याकडे कानाडोळा केल्याने कृषी विभागाच्या आशीर्वादानेच जिल्ह्यात बनावट खताचा लबाडीचा धंदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहर परिसरातील खानापूर शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बनावट खत व शेती उपयोगी औषधींचा साठा जप्त करण्याची कारवाई केली असली तरी ज्या कृषी विभागावर हा सर्व प्रकार रोखण्याची जबाबदारी आहे तो कृषी विभाग चक्क साखर झोपेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ या संदर्भात तपासणी करण्यासाठी या विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा असतानाही या विभागाने त्याकडे कानाडोळा केल्याने कृषी विभागाच्या आशीर्वादानेच जिल्ह्यात बनावट खताचा लबाडीचा धंदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे़परभणी जिल्ह्यामध्ये २ हजार २४८ कृषी दुकानांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री केली जाते़ या दुकानांतून शेतकºयांना मिळणारा माल हा शुद्ध व चांगल्या प्रतीचा आहे का? हे तपासण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे़ यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षण व जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालय कार्यरत आहे़ या अंतर्गत जिल्ह्यामध्ये १३ तपासणी अधिकारी आहेत़ यामध्ये ९ तालुका कृषी अधिकारी, एक उपविभागीय कृषी अधिकारी व एक तंत्र अधिकाºयाचा समावेश आहे़ खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री करणाºया २ हजार २४८ दुकानांची तपासणी करणे आवश्यक आहे; परंतु, यातील फक्त ६४० दुकानांचीच तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये किटक नाशकांची ७८४ पैकी ७९ दुकाने तपासण्यात आली़ तर खतांच्या ७२५ पैकी १४० दुकानांची तपासणी करण्यात आली़ त्याचबरोरबर ७३९ बियाणे विक्री करणाºया दुकानांपैकी ४२१ दुकानांची तपासणी करण्यात आली़ १३ अधिकाºयांचा लवाजमा उपलब्ध असतानाही १ हजार ६०८ दुकानांची तपासणी करण्याची तसदी या अधिकाºयांना घ्यावीशी वाटली नाही़ या संदर्भात जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सामाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वर्षभरात सर्व दुकाने तपासण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले; परंतु, कृषी निविष्ठांची तपासणी खरीप व रबी हंगामाच्या प्रारंभीच होणे आवश्यक आहे़ कारण त्याचवेळेला बळीराजा आपल्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ मिळावे, यासाठीची स्वप्ने पाहून कृषी निविष्ठांची खरेदी करीत असतो़ याची जाण मात्र अधिकाºयांना नसल्याचे दिसून येते़विशेष म्हणजे ज्या ६४० दुकानातील नमुन्यांची तपासणी करण्यात आली़ त्यातील फक्त २१ नमुने काढून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले़ प्रयोगशाळेने या नमुन्यांबाबत काय अहवाल दिला हे मात्र कृषी विभागाचे अधिकारी आणि तपासणी करणाºया प्रयोगशाळेतील अधिकाºयांनाच माहित आहे़ एकीकडे शेतकºयांना देण्यात येणाºया कृषी निविष्ठांची व्यवस्थित तपासणी होत नसताना दुसरीकडे शेतकºयांना देण्यात येणारी बियाणे, खते, किटकनाशके कोणती आहेत? ती कशी हाताळावी याचे प्रशिक्षण शेतकºयांना देणे गरजेचे होते; परंतु, काही मोजक्याच शेतकºयांना याचे प्रशिक्षण देऊन कृषी विभागाने हातवर केले आहेत़ त्याचबरोबर जिल्ह्याच्या कानाकोपºयामध्ये कुठे बनावट खत, औषधी तयार करण्याची कारखाने आहेत का? याचा तपास करून शोध घेणे गरजेचे असताना जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी असा कोणताच शोध घेतला नाही़ अखेर २१ जुलै रोजी परभणी शहरातील खानापूर ते पिंगळी रस्त्यावर कॅनॉलच्या पुढे एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट खत, औषधी तयार करणाºया कारखान्याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या पथकाने पर्दाफाश केला़ त्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांना या कारखान्याची कानकून लागली़ त्यानंतर धावत जाऊन शनिवारी पहाटे ६ वाजेपर्यंत त्या कारखान्याचा पंचनामा करण्यात आला. या सर्व प्रकरणात कृषी विभागाची निष्क्रियता बनावट कृषी निविष्ठा तयार करणाºयांच्या पथ्थावर पडल्याचे दिसून येत आहे.२९ लाखांची बनावट खत, औषधी जप्तदरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी शहरातील खानापूर शिवारातील गोदामात टाकलेल्या धाडीत जप्त केलेली बनावट खते, किटकनाशके आदींची मोजदाद शनिवारी पूर्ण झाली़ त्यानुसार २८ लाख ७६ हजार ९१० रुपयांचा बनावट कृषी निविष्ठांचा साठा आढळून आल्याचे स्पष्ट झाले़ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांना पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले होते़ त्यांनी याबाबतची पाहणी केली़ त्यानंतर या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनिल गोपिनवार यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत़ या प्रकरणी एक महिला व पुरुष अशा दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ शेतकºयांनी खते, किटकनाशके व अन्य शेती उपयोगी औषधी खरेदी करीत असताना ती अधिकृत असल्याची खात्री करूनच खरेदी करावीत़ संशयास्पद कृषी निविष्ठा आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीParbhani policeपरभणी पोलीस