शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

परभणी : मासोळी प्रकल्पाने गाठली पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:17 AM

तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या मासोळी प्रकल्पाने चार वर्षानंतर पन्नाशी गाठल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावातील व गंगाखेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या मासोळी प्रकल्पाने चार वर्षानंतर पन्नाशी गाठल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावातील व गंगाखेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.गंगाखेड तालुक्यात असलेल्या डोंगर भागातील ४०० एकर जमिनीवर १९७२ सालच्या दुष्काळात उभारण्यात आलेला मासोळी प्रकल्प गेल्या चार वर्षात अत्यल्प प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे कोरडाच राहिला होता.गतवर्षी १७ सप्टेंबर २०१८ रोजी या प्रकल्पात केवळ ९ टक्केच एवढाच पाणीसाठा उपलब्ध होता. डिसेंबर २०१८ च्या अखेरीस हा प्रकल्प मृतसाठ्यात गेल्याने चालू वर्षात आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या मृतसाठ्यातील पाण्यावरच गंगाखेड शहर व परिसरातील गावांची तहान भागविण्यात आली. चालू वर्षात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात व सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी तालुका व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे तसेच अधूनमधून कोसळत असलेल्या पावसाच्या सरीमुुळे मासोळी प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मासोळी प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला.मासोळी प्रकल्पाने पन्नाशी ओलांडल्याने परिसरातील माखणी, खोकलेवाडी, सुप्पा, इसाद, सिरसम आदी गावांसह गंगाखेड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्याच बरोबर मासोळी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचा सिंचनासाठी मोठा फायदा होणार असल्याने परिसरातील शेतकरी समाधानी झाले आहेत. आगामी काळात डोंगर भागातील कोद्री, बडवणी, डोंगरजवळा, पिंपळदरी, सुप्पा आदी भागात दमदार पाऊस झाल्यास मासोळी प्रकल्प १०० टक्के भरेल, असा आशावाद मासोळी प्रकल्पात कार्यरत अधिकारी व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.२०१६ मध्ये भरभरून वाहिला प्रकल्पच्२०१७- १८ मध्ये पावसाने उघडीप दिल्याने मासोळी प्रकल्पात पाणीसाठा झालाच नाही. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१७ पासून या प्रकल्पात केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. २०१७ पेक्षाही भयावह परिस्थिती २०१८ मध्ये तालुक्यात निर्माण झाली. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१८ मध्ये प्रकल्पाच्या पाण्यात घट होऊन केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला. २०१८ च्या डिसेंबर अखेरीस मासोळी प्रकल्पाने तळ गाठत हा प्रकल्प मृतसाठ्यात गेला.च्उपलब्ध असलेल्या मृतसाठ्यातील पाण्यावरच तालुक्यातील काही गावांची व गंगाखेड शहराची आॅगस्ट महिन्यापर्यंत तहान भागविण्यात आली. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत सुरू झालेल्या पावसामुळे आज रोजी या प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा झाल्याने शेतकरी व आणि नागरिंकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान चार वर्षांच्या कालावधीत २०१६ मध्येच हा मासोळी प्रकल्प १०० टक्के भरला होता.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पdroughtदुष्काळWaterपाणी