शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जलयुक्तच्या बंधाऱ्याने वाघाळा ग्रामस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:17 IST

दुष्काळी भागात पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असतानाच तालुक्यातील वाघाळा येथे मात्र मे महिन्यातही पाणीपुरवठा करणाºया विहिरीला ६० फुटापर्यंत पाणी आहे. त्यामुळे जलयुक्तच्या तीन बंधाºयामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी उद्भवलाच नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): दुष्काळी भागात पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असतानाच तालुक्यातील वाघाळा येथे मात्र मे महिन्यातही पाणीपुरवठा करणाºया विहिरीला ६० फुटापर्यंत पाणी आहे. त्यामुळे जलयुक्तच्या तीन बंधाºयामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी उद्भवलाच नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे.पाथरी तालुक्यातील वाघाळा गावची लोकसंख्या ४ हजाराच्या घरात आहे. गावात ६०० कुटुंब गुण्या-गोविंदाने नांदतात. गावातील कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा योजनेच्या नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासाठी सार्वजनिक जुनी विहीर आहे. या विहिरीचे ८७ फूट खोल खोदकाम झालेले आहे. या विहिरीतून गाव परिसरात बांधण्यात आलेल्या ७० हजार लिटरची १ व १ लाख २५ हजार लिटरची दुसरी असे दोन जलकुंभ उभारण्यात आले आहेत. चार वर्षापूर्वी वाघाळा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे पाठपुरावा करीत जलस्त्रोताचे अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला; परंतु, जलस्त्रोतांचेही पाणी अपुरे पडत असल्याने गावात दोन खाजगी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. चार वर्षापूर्वी निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गाव परिसरात ५ सिमेंट बंधारे बांधण्यात आली. ५ पैकी ३ बंधारे पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या बाजूला आहेत. त्याच बरोबर भूजल सर्वेक्षण विभागाकडून याच नाल्यावर ५ रिचार्ज शिप्ट घेण्यात आले. याचा फायदा पाणीपुरवठा करणाºया विहिरींना होऊन पाणीपातळीत मोठी वाढ झाली. पाथरी तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असताना वाघाळा ग्रामस्थांना मात्र सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत दर तिसºया दिवशी नळाद्वारे घरपोच पाणी मिळत असल्याने दुष्काळाच्या दाहकतेची जाणीव सुद्धा झाली नसल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.जायकवाडीच्या पाण्याचाही फायदा४वाघाळा गाव परिसरातून जायकवाडीच्या डाव्या कालव्याची वितरिका जाते. याच वितरिकेतून जायकवाडीचे पाणी फेब्रुवारी महिन्यात जलयुक्तच्या बंधाºयात सोडण्यात आले होते.४बंधाºयात पाणी आल्याने आपोआपच पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दुष्काळतही मूबलक पाणी मिळत आहे. त्याच बरोबर पाणीपुरवठा योजनेसोबत गावातील १५ बोअरवेलला भरपूर पाणी आहे.४त्यामुळे पाणीटंचाईच्या आराखड्यात गावातील कोणतीही कामे प्रस्तावित करण्याची वेळ ग्रामपंचायतीला आलीली नाही.पूर्वी गावात पाणीटंचाई जानवत होती. ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी भटकंतीही करावी लागत होती. मात्र पाणीपुरवठ्यासाठी योग्य नियोजन, जलयुक्त बंधाºयासोबतच जायकवाडीच्या पाण्याचा फायदा झाल्याने गावात ग्रामस्थांना दुष्काळातही मूबलक पाणी मिळत आहे.अर्चना घुंबरे, सरपंच , वाघाळा

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई