शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

परभणी : जलयुक्तच्या बंधाऱ्याने वाघाळा ग्रामस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:17 IST

दुष्काळी भागात पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असतानाच तालुक्यातील वाघाळा येथे मात्र मे महिन्यातही पाणीपुरवठा करणाºया विहिरीला ६० फुटापर्यंत पाणी आहे. त्यामुळे जलयुक्तच्या तीन बंधाºयामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी उद्भवलाच नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): दुष्काळी भागात पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असतानाच तालुक्यातील वाघाळा येथे मात्र मे महिन्यातही पाणीपुरवठा करणाºया विहिरीला ६० फुटापर्यंत पाणी आहे. त्यामुळे जलयुक्तच्या तीन बंधाºयामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी उद्भवलाच नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे.पाथरी तालुक्यातील वाघाळा गावची लोकसंख्या ४ हजाराच्या घरात आहे. गावात ६०० कुटुंब गुण्या-गोविंदाने नांदतात. गावातील कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा योजनेच्या नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासाठी सार्वजनिक जुनी विहीर आहे. या विहिरीचे ८७ फूट खोल खोदकाम झालेले आहे. या विहिरीतून गाव परिसरात बांधण्यात आलेल्या ७० हजार लिटरची १ व १ लाख २५ हजार लिटरची दुसरी असे दोन जलकुंभ उभारण्यात आले आहेत. चार वर्षापूर्वी वाघाळा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे पाठपुरावा करीत जलस्त्रोताचे अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला; परंतु, जलस्त्रोतांचेही पाणी अपुरे पडत असल्याने गावात दोन खाजगी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. चार वर्षापूर्वी निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गाव परिसरात ५ सिमेंट बंधारे बांधण्यात आली. ५ पैकी ३ बंधारे पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या बाजूला आहेत. त्याच बरोबर भूजल सर्वेक्षण विभागाकडून याच नाल्यावर ५ रिचार्ज शिप्ट घेण्यात आले. याचा फायदा पाणीपुरवठा करणाºया विहिरींना होऊन पाणीपातळीत मोठी वाढ झाली. पाथरी तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असताना वाघाळा ग्रामस्थांना मात्र सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत दर तिसºया दिवशी नळाद्वारे घरपोच पाणी मिळत असल्याने दुष्काळाच्या दाहकतेची जाणीव सुद्धा झाली नसल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.जायकवाडीच्या पाण्याचाही फायदा४वाघाळा गाव परिसरातून जायकवाडीच्या डाव्या कालव्याची वितरिका जाते. याच वितरिकेतून जायकवाडीचे पाणी फेब्रुवारी महिन्यात जलयुक्तच्या बंधाºयात सोडण्यात आले होते.४बंधाºयात पाणी आल्याने आपोआपच पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दुष्काळतही मूबलक पाणी मिळत आहे. त्याच बरोबर पाणीपुरवठा योजनेसोबत गावातील १५ बोअरवेलला भरपूर पाणी आहे.४त्यामुळे पाणीटंचाईच्या आराखड्यात गावातील कोणतीही कामे प्रस्तावित करण्याची वेळ ग्रामपंचायतीला आलीली नाही.पूर्वी गावात पाणीटंचाई जानवत होती. ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी भटकंतीही करावी लागत होती. मात्र पाणीपुरवठ्यासाठी योग्य नियोजन, जलयुक्त बंधाºयासोबतच जायकवाडीच्या पाण्याचा फायदा झाल्याने गावात ग्रामस्थांना दुष्काळातही मूबलक पाणी मिळत आहे.अर्चना घुंबरे, सरपंच , वाघाळा

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई