शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

परभणी : जलयुक्तच्या बंधाऱ्याने वाघाळा ग्रामस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:17 IST

दुष्काळी भागात पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असतानाच तालुक्यातील वाघाळा येथे मात्र मे महिन्यातही पाणीपुरवठा करणाºया विहिरीला ६० फुटापर्यंत पाणी आहे. त्यामुळे जलयुक्तच्या तीन बंधाºयामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी उद्भवलाच नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): दुष्काळी भागात पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असतानाच तालुक्यातील वाघाळा येथे मात्र मे महिन्यातही पाणीपुरवठा करणाºया विहिरीला ६० फुटापर्यंत पाणी आहे. त्यामुळे जलयुक्तच्या तीन बंधाºयामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी उद्भवलाच नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे.पाथरी तालुक्यातील वाघाळा गावची लोकसंख्या ४ हजाराच्या घरात आहे. गावात ६०० कुटुंब गुण्या-गोविंदाने नांदतात. गावातील कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा योजनेच्या नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासाठी सार्वजनिक जुनी विहीर आहे. या विहिरीचे ८७ फूट खोल खोदकाम झालेले आहे. या विहिरीतून गाव परिसरात बांधण्यात आलेल्या ७० हजार लिटरची १ व १ लाख २५ हजार लिटरची दुसरी असे दोन जलकुंभ उभारण्यात आले आहेत. चार वर्षापूर्वी वाघाळा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे पाठपुरावा करीत जलस्त्रोताचे अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला; परंतु, जलस्त्रोतांचेही पाणी अपुरे पडत असल्याने गावात दोन खाजगी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. चार वर्षापूर्वी निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गाव परिसरात ५ सिमेंट बंधारे बांधण्यात आली. ५ पैकी ३ बंधारे पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या बाजूला आहेत. त्याच बरोबर भूजल सर्वेक्षण विभागाकडून याच नाल्यावर ५ रिचार्ज शिप्ट घेण्यात आले. याचा फायदा पाणीपुरवठा करणाºया विहिरींना होऊन पाणीपातळीत मोठी वाढ झाली. पाथरी तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असताना वाघाळा ग्रामस्थांना मात्र सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत दर तिसºया दिवशी नळाद्वारे घरपोच पाणी मिळत असल्याने दुष्काळाच्या दाहकतेची जाणीव सुद्धा झाली नसल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.जायकवाडीच्या पाण्याचाही फायदा४वाघाळा गाव परिसरातून जायकवाडीच्या डाव्या कालव्याची वितरिका जाते. याच वितरिकेतून जायकवाडीचे पाणी फेब्रुवारी महिन्यात जलयुक्तच्या बंधाºयात सोडण्यात आले होते.४बंधाºयात पाणी आल्याने आपोआपच पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दुष्काळतही मूबलक पाणी मिळत आहे. त्याच बरोबर पाणीपुरवठा योजनेसोबत गावातील १५ बोअरवेलला भरपूर पाणी आहे.४त्यामुळे पाणीटंचाईच्या आराखड्यात गावातील कोणतीही कामे प्रस्तावित करण्याची वेळ ग्रामपंचायतीला आलीली नाही.पूर्वी गावात पाणीटंचाई जानवत होती. ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी भटकंतीही करावी लागत होती. मात्र पाणीपुरवठ्यासाठी योग्य नियोजन, जलयुक्त बंधाºयासोबतच जायकवाडीच्या पाण्याचा फायदा झाल्याने गावात ग्रामस्थांना दुष्काळातही मूबलक पाणी मिळत आहे.अर्चना घुंबरे, सरपंच , वाघाळा

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई