शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

परभणी : एक लाख रोपे करपण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:47 AM

एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जून महिन्यामध्ये तालुक्यात ६४ ग्रामपंचायतींतर्गत शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, रस्ते, स्मशानभूमी आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. पंचायत समिती, कृषी विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागाने तालुक्यात सुमारे एक लाख झाडे लावली. दरवर्षी वृक्ष लागवड योजना राबविली जाते. मात्र संवर्धनासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.त्यामुळे वर्षानुवर्षापासून गाजावाजा करून केवळ अभियान राबविले जात असून वृक्षांचे संवर्धन मात्र होत नाही. यावर्षी या योजनेत निसर्गानेही खोडा घातला आहे. तालुक्यात एक महिन्यापासून पाऊस झाला नसल्याने लावलेली झाडे वाळत आहेत. त्यामुळे या अभियानाचाच बोजवारा उडण्याची स्थिती पालम तालुक्यात निर्माण झाली आहे.लोकसहभाग मिळूनही यंत्रणेचे दुर्लक्षतालुक्यातील आरखेड, पेठशिवणी व कापसी ग्रामपंचायतींनी प्रत्येकी ५ हजार या प्रमाणे १५ हजार रोपांची लागवड लोकसहभागातून केली. यासाठी ५० ते १ लाख रुपयांची पदरमोडही ग्रामस्थांनी केली. मात्र वृक्ष संगोपन करताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. निधी नसल्याने झाडांना पाणी घालणे, कुंंपन लावणे, काठीचा आधार देणे ही कामे ठप्प पडली आहेत. लोकसहभागातून लावलेली रोपे जगावीत यासाठी सरपंच, उपसरपंच प्रयत्न करीत असले तरी प्रशासकीय पातळीवर सहकार्य मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईRainपाऊस