शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

परभणीऊ भिजपावसाने पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:12 PM

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी रात्री जिल्हाभरात सर्वदूर झालेल्या भिज पावसाने सलाईनवर असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. रिमझिम पावसाच्या सरीने यावर्षी प्रथमच निर्माण झालेले पावसाळी वातावरण जिल्हावासियांना सुखावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी रात्री जिल्हाभरात सर्वदूर झालेल्या भिज पावसाने सलाईनवर असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. रिमझिम पावसाच्या सरीने यावर्षी प्रथमच निर्माण झालेले पावसाळी वातावरण जिल्हावासियांना सुखावत आहे.यावर्षी पावसाने ताण दिल्यामुळे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत दुष्काळी परिस्थिती कायम होती. पावसाची प्रतीक्षा करताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होते. शुक्रवारी रात्रीपासून वातावरणात बदल झाला. जिल्हाभरात सर्वदूर भिजपाऊस झाला आहे. रात्री ११ वाजेपासून अनेक भागात पावसाने हजरी लावली. त्यामुळे वातावरणात बºयापैकी गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ८७ टक्के पेरण्या झाल्या. शेतकऱ्यांनी जोखीम पत्करुन पेरा केला; परंतु, त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली होती. अंकुरलेली पिके कोमेजून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यातच मागील आठवड्यात उन्हाचा कडाका वाढल्याने शेतकरी अधिकच धास्तावले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेला पाऊस पिकांना जीवदान देणारा ठरला आहे.परभणी शहर आणि परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पावसाला प्रारंभ झाला. सुरुवातीला भुरभूर असलेला हा पाऊस काही वेळानंतर रिमझिम स्वरुपात बरसत राहिला. शनिवारी सकाळच्या सुमारासही मध्यम पावसाच्या दोन-तीन सरी कोसळल्या. दुपारी १२ वाजेपर्यंत हा पाऊस कायम होता. पावसामुळे शहर परिसरात सखल भागात पाणी साचले आहे. शहरासह पालम, जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, पूर्णा, गंगाखेड या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली.पालममध्ये चिंतेचे वातावरण दूर४पालम तालुक्यात १९ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस समाधानकारक नसला तरी पिके वाचविण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे शेतकºयांचे चिंतेचे वातावरण काही काळासाठी दूर झाले आहे. यावर्षी तालुक्यात सोयाबीन, मूग, उडीद, संकरित ज्वारी या पिकांची कोरडी पेरणी केली आहे. अनेकांनी कापसाची लागवड उरकून घेतली होती. जुलै अर्धा संपत आला तरी पाऊस बरसत नसल्याने पिके सुकत होती. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने या पिकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी देखील शहरासह तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु होता.गंगाखेड तालुक्यात दीर्घ विश्रांतीनंतर हजेरी४दीर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्री तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोमेजत असलेल्या पिकांना मोठा आधार मिळाला असून, पिके पुन्हा डोलू लागली आहेत. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत माखणी मंडळात सर्वाधिक १२ मि.मी., राणीसावरगाव मंडळात ८ मि.मी., गंगाखेड मंडळात ६ मि.मी. व महातपुरी मंडळात ३ मि.मी असा तालुक्यात ७.२५ मि.मी. पाऊस झाला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत रिमझीम पाऊस झाल्याने पिकांना मोठा आधार मिळाला आहे.सरासरी ५.४३ मि.मी. पाऊस४शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५.४३ मि.मी. पाऊस झाला. पालम तालुक्यात सर्वाधिक १६.३३ मि.मी., सोनपेठ तालुक्यात १३ मि.मी., गंगाखेड ७.२५ , पूर्णा ७.४०, सेलू २.४०, मानवत १.३३ आणि पाथरी तालुक्यात ०.६७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीdroughtदुष्काळ