शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

परभणी : ६० वर्षांनी आली लाल परी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:55 PM

जिंतूर तालुक्यातील विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी या गावांमध्ये तब्बल ६० वर्षानंतर बससेवा सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. आ.विजय भांबळे यांनी याकामी प्रयत्न केले. त्यास यश मिळाल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी या गावांमध्ये तब्बल ६० वर्षानंतर बससेवा सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. आ.विजय भांबळे यांनी याकामी प्रयत्न केले. त्यास यश मिळाल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आहे.विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी ही गावे दुर्गम भागातील असून रस्त्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या गावात बससेवा पोहोचत नव्हती. परिणामी तालुक्याशी संपर्क करताना ग्रामस्थांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत असे. यागावांसाठी बससेवा सुरु करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी आ.विजय भांबळे यांच्याकडे केली. गावकऱ्यांचा प्रश्न आ.विजय भांबळे यांनी वरील गावांतील रस्त्यांचे डांबरीकरण करुन घेतले. रस्ते चांगले झाल्यामुळे बससेवा सुरु करण्यातील अडथळे दूर झाले होते. त्यामुळे बससेवेसाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्यासही यश आले. जिंतूर ते विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी, मांडवा, इटोली, अशी बससेवा सुरु करण्यात आली असून २ दिवसांपूर्वी गावात बस पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी या बससेवेचे जोरदार स्वागत केले. दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ.विजय भांबळे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, तालुकाध्यक्ष मनोज थिटे, नगरसेवक उस्मान पठाण, शाहेद बेग मिर्झा, शिवाजी जाधव, शंकर गंजे, वाजीद भाई, हबीब शेख, शांतिलाल चोरडिया आदींची उपस्थिती होती.दळणवळण : प्रश्न सुटल्याने समाधान४जिंतूर तालुक्यातील घेवंडा तांडासह अनेक गावे दुर्गभ भागात आहेत. या गावांमध्ये दळणवळणाची कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना तालुक्याचे ठिकाण गाठण्यासाठी कसरत करावी लागत होती. खाजगी वाहनांच्या सहाय्याने तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत.४त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बससेवा सुरु नसल्याने आ.विजय भांबळे यांनी हा प्रश्न उचलून धरत आधी रस्त्यांचे डांबरीकरण केले आणि त्यानंतर बससेवा सुरु केली. त्यामुळे ग्रामस्थांनी गैरसोय दूर झाली अहे.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी