शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :९८८ शेतकऱ्यांचे उंचावले मनोबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:12 IST

राज्य शासनाच्या प्रेरणा प्रकल्प व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिकदृष्ट्या खचलेल्या तब्बल ९८८ शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी केले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना एक प्रकारे मानसिक आधार मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाच्या प्रेरणा प्रकल्प व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिकदृष्ट्या खचलेल्या तब्बल ९८८ शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी केले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना एक प्रकारे मानसिक आधार मिळाला आहे.मागील काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शेतात पिकत नसल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले होते. राज्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने शेतकºयांचे मनोबल उंचावणे आणि त्यांना धीर देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये प्रेरणा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून या जिल्ह्यात ग्रामस्तरावर शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत आहे.परभणी जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविला जात असून, त्याअंतर्गत वर्षभरातून दोन वेळा सर्वेक्षण केले जाते. त्यात ७ हजार ८३४ शेतकºयांपर्यंत आरोग्य विभागाचे कर्मचारी पोहोचले. या शेतकºयांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करुन त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यात ९८८ शेतकरी तीव्र प्रकारात आणि १८३५ शेतकरी मध्यम प्रकारात मोडत असल्याचा अहवाल या प्रकल्पाने काढला.एकंदर हे शेतकरी आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत होते. त्यामुळे तीव्र आणि मध्यम प्रकारात मोडणाºया शेतकºयांचे प्रबोधन करण्यात आले. त्यांना आरोग्याच्या सर्व सुविधा मोफत पुरविण्यात आल्या.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे या शेतकºयांचे मनोबल उंचावले आहे. या प्रकल्पामुळे तब्बल ९८८ शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.दररोज होतो पाठपुरावाप्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात ९८८ शेतकरी अतितीव्र प्रकारच्या मन:स्थितीत असल्याचे आढळले. या शेतकºयांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षातील अधिकारी, कर्मचारी दररोज शेतकºयांचा पाठपुरावा करीत असत. त्यांना काय लागते, त्यांची मन:स्थिती कशी आहे, याबरोबरच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात असते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधूनच अतितीव्र गटातील ९८८ आणि मध्यम गटातील १८३५ शेतकºयांचे मनोबल सध्या उंचावले असून, हे शेतकरी परिस्थितीशी सामना करण्यासाठी सक्षम झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून दिली. या कामी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथर, मनोविकार तज्ज्ञ डॉ.तारेक अन्सारी, अमरदीप घाडगे, प्रशांत पतंगे, महादेव जाधव, भास्कर काऊतकर आदींनी प्रयत्न केले.आशा सेविकांमार्फत सर्वेक्षणया प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील आशा सेविकांमार्फत शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच या आशा सेविकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षणही देण्यात आले. शेतकरी कोणत्या कारणांमुळे नैराश्यात गेला, याचा शोधही या सेविकांमार्फत घेतला जातो. त्यानंतर मानसिक जिल्हा आरोग्य कार्यक्रमांतर्गत कौटुंबिक समुपदेशन, वर्तणूक उपचार, मानसोपचार व औषधोपचार या माध्यमातून शेतकºयांना मदत केली जाते.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी