शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

परभणी: अंत्यविधीसाठी आलेले ५४ जण ‘क्वारंटाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:14 AM

येथील एका महिलेच्या अंत्यविधीसाठी आलेल्या मुंबईतील ५ आणि इतर जिल्ह्यांतील १९ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले असून,या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या बोरी येथील ३१ जणांनाही क्वारंटाईन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : येथील एका महिलेच्या अंत्यविधीसाठी आलेल्या मुंबईतील ५ आणि इतर जिल्ह्यांतील १९ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले असून,या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या बोरी येथील ३१ जणांनाही क्वारंटाईन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे़बोरी येथील एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीसाठी २२ एप्रिल रोजी मुंबई आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतून नातेवाईक बोरी गावात दाखल झाले होते़ मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला आहे़ त्यामुळे हा भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित झाला आहे़ मुंबई आणि इतर जिल्ह्यातून नातेवाईक बोरीत आले असल्याची माहिती ग्रा़प़ं़ला मिळाल्यानंतर सरपंच सखाराम शिंपले, उपसरपंच अश्विनी चौधरी, ग्रामविकास अधिकारी एस़व्ही़ ढोणे, तलाठी सुभाष होळ, ग्रा़पं़ कर्मचारी दत्ता चौधरी यांनी या नातेवाईकांचा शोध घेवून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ या सर्वांची आरोग्य तपासणी केल्यानंतर मुंबईहून आलेल्या ५ जणांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात तर इतर जिल्ह्यातून आलेल्या १९ नातेवाईकांना अकोली येथील वसतिगृहात ठेवण्यात आले आहे़ त्याच प्रमाणे मुंबई येथील ५ नागरिकांच्या संपर्कत आलेल्या बोरीतील ३१ नातेवाईकांना येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय कन्या शाळेमध्ये क्वारंटाईन केले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ़ किरण चांडगे यांनी दिली़४० जणांविरूद्ध गुन्हाबोरी : येथील एका महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित राहिल्या प्रकरणी मुंबई व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामधून आलेल्या ४० नातेवाईकाविरूद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करून हा रोग पसरविण्याची भीती निर्माण केल्या प्रकरणी राष्ट्रीय अपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ४० जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष मारकड यांनी दिली़२३ उसतोड कामगारांचे विलगीकरण४चारठाणा : परजिल्ह्यातून चारठाणा येथे आलेल्या २३ उसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करून या कामगारांचे विलगीकरण करण्यात आले आहे़ २२ एप्रिल रोजी सावरगाव, केहाळ, मोहाडी, अंबरवाडी आदी गावांमधील २३ उसतोड कामगारांना घेऊन एक ट्रक चारठाणा आरोग्य केंद्रात दाखल झाला़ येथे वैद्यकीय अधिकारी डॉ़ शेख माजिद यांनी इन्फ्रारेड थर्मामीटरच्या सहाय्याने कामगारांची तपासणी केली़ दरम्यान, या उसतोड कामगारांना त्यांच्या गावी विलगीकरण करण्यात आले असून, कामगारांची जबाबदारी संबंधित गावांवर सरपंचावर देण्यात आली आहे़ त्याच प्रमाणे बिहार राज्यातील तलावाचे काम करणाऱ्या ५ मजुरांनाही १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ हे कामगार सहा महिन्यांपासून जिल्ह्यातच आहेत; परंतु, काही कामानिमित्त ते सेलू येथे गेले होते़ तेथून चारठाणा गावाकडे येत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार यांनी या कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले़ तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशावरुन या पाचही कामगारांना ब्राह्मणगाव येथील शेतात विलगीकरण करून ठेवले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस