शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

परभणी : ४० हजार मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:12 IST

तालुक्यातील ग्रामीण भागातून कामाच्या शोधासाठी ४० हजारांहून अधिक मजुरांनी स्थलांतर केले आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात कामासाठी मजुरांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यातील ग्रामीण भागातून कामाच्या शोधासाठी ४० हजारांहून अधिक मजुरांनी स्थलांतर केले आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात कामासाठी मजुरांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पहावयास मिळत आहे.तालुक्यामध्ये रोजगाराच्या कोणत्याच सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. कमी पाऊस, शेतीची नापिकी यामुळे शेतामध्ये काम नाही. प्रशासनाच्या वतीने रोजगार हमी योजनेची अनेक कामे सुरु असतात; परंतु, मागील तीन वर्षापासून रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत. परिणामी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक गावे ओस पडली आहेत. तालुक्यातील वझर, सावंगी म्हाळसा, वाघी धानोरा हा डोंगरपट्टा आहे. या भागांमध्ये केवळ खरीप पिके घेतली जातात. यावर्षी तर पाऊस झाला नसल्याने या भागातील मजुरांवर उपासमारीची कुºहाड कोसळली आहे. वझर या गटामध्ये १७ गावे असून कोठा तांडा, कोरवाडी तांडा, हंडी तांडा, असोला तांडा, सावंगी तांडा, बोरगाव वाडी तांडा हे ६ तांडे आहेत. या गटातून साधारण तीन ते साडेतीन हजार मजुरांचे कामासाठी स्थलांतर झाले आहेत. दुसरीकडे सावंगी म्हाळसा या गटात १८ गावांचा समावेश आहे. यामध्ये विजयनगर तांडा, रामनगर तांडा, चव्हाळीक तांडा, अंबरवाडी तांडा, जोगी तांडा, आवलगाव तांडा, संक्राळा या गावातून सर्वाधिक मजूर स्थलांतरित झाले आहेत. साधारणत: ५ ते ६ हजार मजूर कामासाठी बाहेरगावी गेले आहेत. आडगाव बाजार गटात २१ गावे असून या गावातील ४ हजार मजूर स्थलांतरित झाले आहेत. कौसडी गटामध्ये १९ गावांचा समावेश असून यामध्ये मंगरुळ तांडा हा एकमेव तांडा आहे. या गटातून साधारण ३ हजार मजुरांचे स्थलांतर झाले आहे. चारठाणा या गटात १८ गावे असून या गटातून जवळपास तीन ते साडेतीन हजार मजूर स्थलांतरीत झाले आहेत. वाघी धानोरा हा डोंगराळ भाग असून या गटात १४ गावांचा समावेश आहे. यामधून ४ ते ५ हजार मजूर स्थलांतरित झाले आहेत. वरुड गटात १७ गावे असून यामधून साडेतीन हजार मजूर स्थलांतरीत झाले आहेत. वस्सा गटात १४ गावांचा समावेश असून ४ हजार मजूर स्थलांतरित झाले आहेत. बोरी गटातून ३ हजार मजूर कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. असे एकूण ४० हजार मजूर कामाच्या शोधात तालुक्यातून बाहेर पडले आहेत.दुसरीकडे जिंतूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कोणतीच कामे सुरु नाहीत. प्रशासन एकीकडे हातावरील कामाची संख्या हजारावर दाखवत असताना हजारात एकही काम सुरु नाही. यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. विशेष म्हणजे यावर्षी शेतीमध्ये काम करणारे १० ते १५ हजार मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या तालुक्यातून सर्वाधिक मजूर औरंगाबाद, आळंदी, नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगरकडे स्थलांतरित झाले आहेत. प्रशासन मात्र या स्थलांतरांच्या प्रश्नावर गंभीर नाही. केवळ कागदोपत्री घोडे नाचवून दिवस काढायचा, हा चालढकलपणा प्रशासनाकडून होत असल्याचे चित्र आहे.ऊसतोड मजूर परतीच्या वाटेवर४तालुक्यातील जवळपास ५० पेक्षा जास्त तांडे व वाडीवस्तीवरील मजूर ऊसतोडीसाठी बाहेर जात असतो. कारखान्याचा पट्टा पडल्याने त्यांच्या हाताला काम नाही. आता हा मजूर गावाकडे परतत आहे; परंतु, गावामध्ये काम उपलब्ध नसल्याने या मजुरांकडे बेरोजगारीशिवाय पर्याय नाही. प्रशासनाने यावर तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्याच बरोबर तालुक्यातील शेतमजुरांना काम मिळत नाही.डोंगरपट्टे पडले ओस४जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा, सावंगी म्हाळसा व वझूर या गटातील काही भाग अतिशय दुर्गम व डोंगरपट्टा आहे. या भागामध्ये मजुरांना काम मिळेल, असे कोणतेही साधन नाही. परिणामी या भागातून स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या भागातील अनेक गावे ओस पडली असून गावामध्ये ज्येष्ठ नागरिक वगळता सर्वजण कामासाठी स्थलांतरीत झाले आहेत.रोजगार हमीकडे दुर्लक्षजिंतूर तालुक्यात मागील तीन ते चार वर्षापासून रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत. ही कामे सुरु झाली तर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो; परंतु, अनेक कंत्राटदार हे मशीनद्वारे काम करतात. प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन ही कामे सुरु केली तर मजुरांच्या हाताला काम मिळेल व शहराकडे स्थलांतरीत होणारे मजुरांचे लोंढे थांबतील.जिंतूर तालुक्यात पंचायत समितीमार्फत सध्या एकही रोजगार हमी योजनेचे काम चालू नाही. त्यातही निवडणूक आचारसंहिता सुरु आहे. विहिरींचे प्रस्ताव आलेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत एकही काम सुरु नाही.-शिवराम ढोणे, विस्तार अधिकारी, पं.स. जिंतूर

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ