शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : २ पाणीपुरवठा योजना सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:07 IST

प्रलंबित देयकांमुळे खंडित करण्यात आलेल्या १६ गावे कुपटा पाणीपुरवठा योजना आणि डासाळा ८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज देयके राज्य शासन टंचाई निवारण निधीतून भरणार असल्याने या दोन्ही योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रलंबित देयकांमुळे खंडित करण्यात आलेल्या १६ गावे कुपटा पाणीपुरवठा योजना आणि डासाळा ८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज देयके राज्य शासन टंचाई निवारण निधीतून भरणार असल्याने या दोन्ही योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिंतूर व सेलू तालुक्यातील १६ गावे कुपटा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची विद्युत देयकाची ७० लाख ९२ हजार २९० रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने या थकबाकीच्या वसुलीसाठी या योजनेचा वीज पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे या योजनेंतर्गत येणाऱ्या सेलू तालुक्यातील कान्हड, कुपटा, वालूर, जिंतूर तालुक्यातील बोरी, कौसडी, हट्टा, झरी, गोंडाळा, भांगापूर, पिंपळगाव, आडगाव, गुळखंड, तांदुळवाडी आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. शिवाय सेलू तालुक्यातील डासाळा ८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील देवाळा धरण येथील पुरवठा विहिरीच्या मोटारीची ६ लाख ८६ हजार ७२६ रुपयांची तसेच रवळगाव येथील जल विद्युत केंद्राची २ लाख ५१ हजार ३५ रुपयांची, सेलू तालुक्यातील बोरगाव संपवेल येथील ३५ हजार ४४८ रुपयांची आणि धामणगाव संपवेल येथील २ हजार ६०० रुपयांची विद्युत बिलाची थकबाकी असल्याने या योजनेचाही वीज पुरवठा महावितरणने खंडित केला होता. त्यामुळे या योजनेंतर्गत येणाºया कुंडी, म्हाळसापूर, देऊळगाव, रवळगाव, गुगळी धामणगाव, तिडी पिंपळगाव, आहेर बोरगाव, डासाळा, मानवत तालुक्यातील मानोली (सर्वात शेवटी या गावाचा समावेश झाला) या गावांनाही पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत होता.यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दुष्काळी भागातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची थकित विद्युत देयके टंचाई निधीमधून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामध्ये या दोन्ही योजना पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनांची विद्युत बिलाच्या थकबाकीतील ५ टक्के रक्कम मदत व पूनर्वसन विभागाकडून महावितरणकडे भरण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान, जिल्ह्यातील अन्य पाणीपुरवठा योजनाही याच धर्तीवर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन प्रयत्नांची गरज आहे.टंचाई निवारणासाठी साडेतीन कोटी खर्चले४पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाच्या वतीने २०१६-१७ व २०१७-१८ या दोन आर्थिक वर्षात ३ कोटी ६८ लाख ९० हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी २०१६-१७ मध्ये ८० लाख रुपये खर्च करण्यात आले असून २०१७-१८ मध्ये १ कोटी ११ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.४२०१६-१७ मध्ये ३३७ खाजगी विहीर/ बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. यामध्ये १ कोटी ३९ लाख ३२ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. २०१७-१८ मध्ये ३२३ खाजगी विहीर, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले. त्यावर ८७ लाख १० हजार रुपयांचा खर्च प्रशासनाकडून करण्यात आला आहे. २०१७-१८ मध्ये १९ योजनांमध्ये विशेष नळदुरुस्ती मोहीम राबविण्यात आली. यावर २७ लाख १ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.४२०१६-१८ मध्ये विंधन विहीर विशेष दुरुस्तीची योजना १४० ठिकाणी राबविण्यात आली. यावर ३० लाख ८० हजार रुपये तर २०१७-१८ मध्ये १९९ योजनांवर ४७ लाख ६२ हजार रुपये खर्च करण्यात आले. तात्पुरती पूरक नळयोजना २०१७-१८ मध्ये चार ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली. यासाठी ११ लाख ५१ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.४नवीन विहीर, कुपनलिका २०१७-१८ मध्ये १७५ ठिकाणी घेण्यात आल्या. यावर ९५ लाख ६३ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. या कुपनलिकांचा पाणीटंचाई दूर करण्यासाठी फायदा झाला .४ लाख शासन भरणार४या दोन्ही योजनांच्या मुद्दल रक्कमेच्या ५ टक्के म्हणजेच ४ लाख ३ हजार ४०३ रुपयांची रक्कम टंचाई निधीमधून मदत व पूनर्वसन विभाग महावितरणला देणार आहे. यामध्ये १६ गावे कुपटा योजनेच्या ३ लाख ५४ हजार ६१५ आणि डासाळा ८ गावे योजनेच्या ४८ लाख ७९४ रुपयांच्या रक्कमेचा समावेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी