उन्हाळा सुरु होताच बसणाऱ्या उन्हाच्या चटक्याबरोबर तालुक्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. यावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने ६६ विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर केले असले तरी उर्वरित भागात पाणीटंचाईवर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. ...
प्लास्टिक कॅरीबॅग आणि थर्माकॉलचा वापर करणाऱ्या शहरातील सात दुकानदारांविरुद्ध महापालिकेने १२ मार्च रोजी कारवाई केली असून, या व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
पूर्णा येथील नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या कामकाजासंदर्भात नगरसेवक मुकूंद भोळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे अनियमित कामकाजासंदर्भात तक्रार केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर कार्यारंभ आदेश मिळालेले काम सुरु करावे की नाही, यावरुन पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे हे पदाधिकारी अधिकाऱ्यांना या अनुषंगाने धारेवर धरत आहेत. ...
जिल्ह्यातील शहरी भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नगरपालिकांनी करावयाच्या उपाययोजनांबाबतच्या २ कोटी ५० लाख रुपयांच्या कृती आराखड्या अंतर्गत अद्यापपर्यंत एकही काम हाती घेतले नसल्याने सद्यस्थितीत तरी टंचाई आराखडा कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे़ ...
तालुक्यातील पोहंडुळ येथील ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी उपसरपंच माधव नानेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ११ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
येथील शासकीय हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मागील १५ दिवसांत ९ मार्चपर्यंत ६६ शेतकऱ्यांची केवळ ४३३ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली आहे. तर बाजार समितीच्या यार्डात २७ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ५२५ क्विंटल तूर श ...
आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करुन घेतली आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत १८ पदाधिकाऱ्यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. ...
तालुक्यातील दुर्डी ते मुरुंबा या रस्त्यावर असलेल्या एका छोट्या पुलावरुन एक ट्रॅक्टर ८ फूट खाली कोसळल्याने एक जण ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना ११ मार्च रोजी सकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास घडली. ...