येथील नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...
शहरात निर्माण झालेली टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना आखल्या असल्या तरी प्रत्यक्षात या कृती आराखड्याला विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली नसल्याने टंचाई निवारणाची कामे ठप्प पडली आहेत. ...
तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढली आहे़ इतर पिकांबरोबरच बागायती पिकांतील कांदा पिकाच्या उत्पादनाला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़ ...
तालुक्यातील वझर येथील पूर्णा नदीपात्रातील वाळुचा लिलाव झालेला नसतानाही लिलाव झालेल्या दुसऱ्या बाजुच्या पावत्यांचा वापर करून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा केला जात आहे़ प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष याकडे झाल्याचे दिसून येत आहे़ ...
जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी तीव्र उन्हाचा सामना करावा लागत असून महिनाभरापासून तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. रविवारी जिल्ह्यात कडक उन्हामुळे रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळाला. ...
परभणी तालुक्यातील पिंगळी येथे शेत शिवारात लागलेल्या आगीमध्ये सुमारे ४ हजार कडबा आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...