शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:50 IST

नारायण चाळ रस्त्याची दुरवस्था परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीपासून नारायण चाळ कॉर्नरपर्यंतचा रस्ता खराब झाला. या रस्त्यावर ...

नारायण चाळ रस्त्याची दुरवस्था

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीपासून नारायण चाळ कॉर्नरपर्यंतचा रस्ता खराब झाला. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनधारकांना खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच हा रस्ता अरुंद असल्याने वाहनधारकांच्या गैरसोयीत आणखीच भर पडत आहे. मपाने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

जाम नाक्यावरील अतिक्रमणे झाली पक्की

परभणी : जिंतूर रस्त्यावरील जाम नाका परिसरात मागील काही वर्षांपासून फळ विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत. राष्ट्रीय महामार्गावर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या फळ विक्रेत्यांकडे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्यावर उभे राहूनच खरेदी करावी लागते. तेव्हा ही बाब लक्षात घेता, या मार्गावरील अतिक्रमणे हटवावित, अशी मागणी होत आहे.

स्टेडियममधील स्वच्छतागृहाची दुरवस्था

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात घाण झाली असून, हे स्वच्छतागृह वापर योग्य राहिले नाही. त्यामुळे खेळाडूंना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

स्टेडियम परिसरातील चौक बनला धोकादायक

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरात चौकाची आखणी करण्यात आली नाही. त्यामुळे चारही बाजूने येणारी वाहने या चौकात येऊन धडकतात. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मनपाने या ठिकाणी चौकाची उभारणी करावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

इमारतीचे बांधकाम संथगतीने

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. या इमारतीत सध्या आतील कामे केली जात आहेत. ही कामे संथगतीने होत असल्याने या इमारतीत जि.प.चे कामकाज कधी सुरू होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कृषी विद्यापीठातील रस्त्यांची दुरवस्था

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे शहराला लागून असलेल्या गावांतील ग्रामस्थांना परभणी शहरात येण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. तेव्हा या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.