शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नांदेडकरांनी पळविले येलदरीचे पाणी; मागणी नसताना ६० दलघमी पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:29 IST

गरज नसताना येलदरी धरणातील पाण्याचा सिद्धेश्वर धरणात विसर्ग केला जात आहे.

ठळक मुद्देआत्तापर्यंत दोन टप्प्यांत ६० दलघमी पाणी या धरणातून सोडण्यात आले आहे.

जिंतूर (जि. परभणी) : अनेक वर्षांनंतर शंभर टक्के भरलेले येलदरी धरण रिकामे करण्याचा डाव राजकीय दबावातून पाटबंधारे विभागाने आखला असून, गरज नसताना येलदरी धरणातील पाण्याचा सिद्धेश्वर धरणात विसर्ग केला जात आहे. आत्तापर्यंत दोन टप्प्यांत ६० दलघमी पाणी या धरणातून सोडण्यात आले आहे.

यावर्षी येलदरी व सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले. या धरणामुळे परभणी जिल्ह्यातील १६ हजार १४२ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील २२ हजार ६५८ हेक्टर व नांदेड जिल्ह्यातील १९ हजार ९८८ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार होता; परंतु शेतकऱ्यांची मागणी नसतानाही २२ नोव्हेंबरपासून सिद्धेश्वर धरणातून कालव्यामार्फत पाटबंधारे विभागाने राजकीय दबावातून पाणी सोडणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, हे पाणी रबी पिकांसाठीही मिळणार नाही. सोडलेल्या पाण्यापैकी केवळ १० टक्के पाण्याचा सिंचनासाठी वापर करुन ९० टक्के पाणी वेगवेगळ्या चाऱ्यातून वाया जात आहे. या पाण्यावरील कोणत्याही चाऱ्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या भागातील शेतकऱ्यांनी शेतात मोठे खड्डे केले आहेत. या खड्ड्यात पाणी भरुन ठेवले जात आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. बिराजदार यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता ‘नंतर बोलतो’, असे म्हणून त्यांनी फोन बद केला. त्यानंतर सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे प्रशासनाची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.

सिद्धेश्वर धरण रिकामे२५ नोव्हेंबर रोजी येलदरी व सिद्धेश्वर १०० टक्के भरले होते. याच कालावधीत नांदेडकडे जाणाऱ्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. २५ जानेवारी रोजी सिद्धेश्वर धरणात केवळ २५ टक्के पाणी शिल्लक राहिले होते.  या प्रकल्पातील ७५ टक्के पाणी नांदेडला सोडण्यात आले. सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी २५ टक्के झाल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी येलदरी धरणातून वीज निर्मितीच्या नावाखाली दररोज ४ दलघमी पाणी सोडण्यात येत आहे.

कारण नसताना घेतले पाणी२२ नोव्हेंबर रोजी सिद्धेश्वर धरणातील ७० टक्के पाणी पहिल्याच पाणी पाळीत सोडून देण्यात आले. त्यानंतर  येलदरीमधून मागील पंधरा दिवसांपासून ६० दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणात सोडण्यात आले आहे. एप्रिल, मेपर्यंत येलदरी धरणातील पाणी घ्यायचे आणि मे महिन्यात जायकवाडीचे पाणी घ्याचे, असा डाव नांदेडच्या नेतृत्वाने आखल्याची शंका शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराविरुद्ध १७ फेब्रुवारी रोजी जिंतूर येथे सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. या प्रश्नी १८ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांची भेट घेऊन नांदेडला जाणारे पाणी बंद करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच २४ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तांची भेट घेतली जाणार असून, त्यानंतर आंदोलन तीव्र केले जाईल.

शासनाने या संदर्भात तातडीने पावले उचलली नाहीत तर जनआंदोलन समितीचे १ हजार कार्यकर्ते जलसमाधी घेतील. त्यानंतर होणाऱ्या परिणामाला पाटबंधारे विभाग जबाबदार राहील. यासाठी शासनाने तातडीने येलदरी- सिद्धेश्वर धरणातून जाणारे पाणी बंद करावे.    - डॉ.दुर्गादास कानडकर,  निमंत्रक, पाणी बचाव आंदोलन समिती, जिंतूर 

टॅग्स :WaterपाणीparabhaniपरभणीNandedनांदेडDamधरण