शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नांदेडकरांनी पळविले येलदरीचे पाणी; मागणी नसताना ६० दलघमी पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:29 IST

गरज नसताना येलदरी धरणातील पाण्याचा सिद्धेश्वर धरणात विसर्ग केला जात आहे.

ठळक मुद्देआत्तापर्यंत दोन टप्प्यांत ६० दलघमी पाणी या धरणातून सोडण्यात आले आहे.

जिंतूर (जि. परभणी) : अनेक वर्षांनंतर शंभर टक्के भरलेले येलदरी धरण रिकामे करण्याचा डाव राजकीय दबावातून पाटबंधारे विभागाने आखला असून, गरज नसताना येलदरी धरणातील पाण्याचा सिद्धेश्वर धरणात विसर्ग केला जात आहे. आत्तापर्यंत दोन टप्प्यांत ६० दलघमी पाणी या धरणातून सोडण्यात आले आहे.

यावर्षी येलदरी व सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले. या धरणामुळे परभणी जिल्ह्यातील १६ हजार १४२ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील २२ हजार ६५८ हेक्टर व नांदेड जिल्ह्यातील १९ हजार ९८८ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार होता; परंतु शेतकऱ्यांची मागणी नसतानाही २२ नोव्हेंबरपासून सिद्धेश्वर धरणातून कालव्यामार्फत पाटबंधारे विभागाने राजकीय दबावातून पाणी सोडणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, हे पाणी रबी पिकांसाठीही मिळणार नाही. सोडलेल्या पाण्यापैकी केवळ १० टक्के पाण्याचा सिंचनासाठी वापर करुन ९० टक्के पाणी वेगवेगळ्या चाऱ्यातून वाया जात आहे. या पाण्यावरील कोणत्याही चाऱ्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या भागातील शेतकऱ्यांनी शेतात मोठे खड्डे केले आहेत. या खड्ड्यात पाणी भरुन ठेवले जात आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. बिराजदार यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता ‘नंतर बोलतो’, असे म्हणून त्यांनी फोन बद केला. त्यानंतर सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे प्रशासनाची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.

सिद्धेश्वर धरण रिकामे२५ नोव्हेंबर रोजी येलदरी व सिद्धेश्वर १०० टक्के भरले होते. याच कालावधीत नांदेडकडे जाणाऱ्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. २५ जानेवारी रोजी सिद्धेश्वर धरणात केवळ २५ टक्के पाणी शिल्लक राहिले होते.  या प्रकल्पातील ७५ टक्के पाणी नांदेडला सोडण्यात आले. सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी २५ टक्के झाल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी येलदरी धरणातून वीज निर्मितीच्या नावाखाली दररोज ४ दलघमी पाणी सोडण्यात येत आहे.

कारण नसताना घेतले पाणी२२ नोव्हेंबर रोजी सिद्धेश्वर धरणातील ७० टक्के पाणी पहिल्याच पाणी पाळीत सोडून देण्यात आले. त्यानंतर  येलदरीमधून मागील पंधरा दिवसांपासून ६० दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणात सोडण्यात आले आहे. एप्रिल, मेपर्यंत येलदरी धरणातील पाणी घ्यायचे आणि मे महिन्यात जायकवाडीचे पाणी घ्याचे, असा डाव नांदेडच्या नेतृत्वाने आखल्याची शंका शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराविरुद्ध १७ फेब्रुवारी रोजी जिंतूर येथे सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. या प्रश्नी १८ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांची भेट घेऊन नांदेडला जाणारे पाणी बंद करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच २४ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तांची भेट घेतली जाणार असून, त्यानंतर आंदोलन तीव्र केले जाईल.

शासनाने या संदर्भात तातडीने पावले उचलली नाहीत तर जनआंदोलन समितीचे १ हजार कार्यकर्ते जलसमाधी घेतील. त्यानंतर होणाऱ्या परिणामाला पाटबंधारे विभाग जबाबदार राहील. यासाठी शासनाने तातडीने येलदरी- सिद्धेश्वर धरणातून जाणारे पाणी बंद करावे.    - डॉ.दुर्गादास कानडकर,  निमंत्रक, पाणी बचाव आंदोलन समिती, जिंतूर 

टॅग्स :WaterपाणीparabhaniपरभणीNandedनांदेडDamधरण