शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 06:38 IST

राज्यात लखपती दीदी कार्यक्रम सुरू असून, एक कोटी लखपती दीदी होणार. देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, परभणी : राज्यात गेल्या अनेक दशकांत शहरांची लोकसंख्या वाढत गेली. मात्र, काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केले. परिणामी पाणीटंचाई, रोगराई, प्रदूषण आणि मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला. ज्यांना जनतेने सत्ता दिली, त्यांनी शहरांचा विकास करण्याऐवजी स्वतःचाच शंभर टक्के विकास केला, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी त्यांची सभा झाली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, भाजप सरकारने गावांबरोबरच शहरांचाही विकास सुरू केला असून, स्मार्टसिटी, अमृत योजना, स्वच्छ शहर अभियानांतर्गत राज्यातील महानगरांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. त्याचा थेट लाभ मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांना झाला आहे.

नांदेडमधील प्रत्येकाला मिळेल हक्काचे घर

नांदेड : केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीब, झोपडवट्टीवासीय आणि कच्च्या घरात राहणाऱ्या मंडळींना पक्की घरे देण्यात येत आहेत. परंतु त्यांच्याकडे जागाच नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी निर्णय घेऊन ते ज्या ठिकाणी राहतात, त्याच ठिकाणचे मालकी हक्क देण्यास सुरुवात झाली आहे. नांदेड शहरातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळालेच पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इंदिरा गांधी मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खा. अशोक चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे उपस्थित होते.

‘देवाभाऊ आहे... एक कोटी दीदी लखपती होणार’

जालना : राज्यात लखपती दीदी कार्यक्रम सुरू असून, एक कोटी लखपती दीदी होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथील सभेत सांगितले.  देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. 

२०१४ मध्ये भाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार आले. तेव्हापासून ग्रामीण भागाचाच नव्हे तर शहरी भागांच्या विकासाची गती वाढली आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, रोजगार निर्मिती आदी विविध क्षेत्रांच्या प्रगतीसाठी भाजप सरकारने मोठा निधी दिला आहे. झोपडपट्टीधारकांना पीआरकार्ड देण्याचा निर्णय घेतला असून, कच्चे घर असेल त्यांना पक्के घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री योजनेतून निधी दिला जाणार आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी भाजपच्या हाती सत्ता द्यावी, असे फडणवीस म्हणाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Neglected Urban Development for 70 Years: CM Fadnavis

Web Summary : Chief Minister Fadnavis accuses Congress of neglecting urban development for 70 years, leading to problems like water scarcity. He highlights BJP's focus on urban development through schemes like Smart City and Pradhan Mantri Awas Yojana, promising homes and improved infrastructure.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा