शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

'दुष्काळात मराठवाडा होरपळतोय, भाजप-सेना सरकार जाणिवपूर्वक अन्याय करतंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 21:36 IST

पाथरी (परभणी) - मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवून सरकार मराठवाड्यावर जाणिवपूर्वक अन्याय करत आहे. संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळतोय तरीही सरकार ...

पाथरी (परभणी) - मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवून सरकार मराठवाड्यावर जाणिवपूर्वक अन्याय करत आहे. संपूर्ण मराठवाडादुष्काळात होरपळतोय तरीही सरकार मराठवाड्याचे हक्काचे पाणी का देत नाही? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा परभणी जिल्ह्यात पोहचली. परभणी शहरात भव्य जनसंघर्ष सभा पार पडली. त्यानंतर पाथरी येथे भव्य जनसंघर्ष सभा झाली. यावेळी व्यासपीठावर खा. राजीव सातव, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, आ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री व परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ. सुरेश देशमुख, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हरिभाऊ शेळके, रामकिशन ओझा, प्रकाश सोनावणे, शाह आलम शेख, समशेर वरपुडकर, रविराज देशमुख, भगवान वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय.मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागती आहे. जनावरांना चारा नाही. पाण्याअभावी पिके व फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. सरकारला मात्र या दुष्काळाचे काही गांभीर्य नाही. दुष्काळी उपापयोजना अद्याप सुरु केल्या नाहीत. पालकमंत्री गायब आहेत. काही पालकमंत्री मोबाईल टॉर्चच्या उजेडात दुष्काळ पाहणी करित आहेत. तर काही पालकमंत्री त्यांचा स्वतःचा जिल्हा दुष्काळात होरपळत असताना अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. ही दुष्काळग्रस्त जनतेची क्रूर थट्टा आहे. दुष्काळ सदृश्य आणि पालकमंत्री अदृश्य अशी परिस्थिती आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

जायकवाडीच्या वरच्या भागातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. पण सरकार जाणिवपूर्वक मराठवाड्याला पाणी देत नाही. अप्पर पैनगंगेचे पाणी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे. जलयुक्त शिवार योजनेवर सरकारने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. या योजनेमुळे भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा सरकारने केला होता पण प्रत्यक्षात भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेत पाणी नाही तर पैसे मुरले आहेत. जलयुक्त शिवार झोलयुक्त शिवार झाले आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. कर्जमाफीची फक्त घोषणा केली पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतक-यांकडून पीक विमा भरून घेतला पण शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. बोँडअळी, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. हे सरकार नाकर्ते आहे. शेतकरी कष्टकऱ्यांना काही मदत करत नाही, त्यामुळे या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जनसंघर्ष सुरु केला आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

यावेळी बोलताना खा. राजीव सातव म्हणाले की, मोदी सरकारने अंबानी अदानींसह 22 उद्योगपतीचे सव्वा दोन लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण शेतक-यांना कर्जमाफी दिली नाही. मेहुल चोकसी, निरव मोदी, विजय मल्ल्या यांना मदत करून बँकांवर दरोडे घालण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून दोन वर्ष उलटले. पण अद्याप काम सुरु झाले नाही. मोदी पाकिस्तानला धडा शिकवणार होते. पण नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आले. मोदींनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. जनता त्यांना धडा शिकवेल असे खा. सातव म्हणाले.  माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार, सुरेश वरपूडकर आ. वजाहत मिर्झा यांनी या सभेला मार्गदर्शन करताना केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा उद्या मंगळवारी जालना व औरंगाबाद जिल्ह्यात जाणार आहे. जालना, फुलंब्री व सिल्लोड येथे जाहीर सभा होणार आहेत.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ