शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक परिसरात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST

डीपींचा पादचाऱ्यांना वाढला धोका परभणी : शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेने वीज वितरण कंपनीच्या डीपी उभारण्यात आल्या आहेत. यापैकी ...

डीपींचा पादचाऱ्यांना वाढला धोका

परभणी : शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेने वीज वितरण कंपनीच्या डीपी उभारण्यात आल्या आहेत. यापैकी बहुतांश डीपीला कुलूप लावलेले नाही. तसेच काही डीपी सराड उघड्या असतात. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी हा परिसर धोकादायक ठरत आहे. त्याचप्रमाणे एखादा अपघात झाला तर गंभीर घटना घडना घडू शकते. तेव्हा महावितरण कंपनीने या डीपींना दरवाजे बसवून कुलूपबंद करावे, अशी मागणी होत आहे.

मनपाच्या उद्यानांची बकाल अवस्था

परभणी : शहरातील मनपाच्या उद्यानांची अवस्था बकाल झाली आहे. मागील वर्षभरापासून या उद्यानांमध्ये कोणतीही विकास कामे झाली नाहीत. लॉकडाऊनमुळे बंद असलेली उद्याने आता खुली करण्यात आली आहेत. मात्र शहरातील मुख्य उद्यान असलेल्या राजगोपालाचारी उद्यानातच खेळणींची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे नेहरू पार्क, गांधी पार्क आणि शिवाजी पार्क या चारही उद्यानांची दुरवस्था झाल्याने ज्येष्ठ नागरिक व बालकांची मात्र कुचंबणा होत आहे.

जिंतूर रस्त्याच्या कामाला गती

परभणी : जिंतूर ते परभणी या महामार्गाच्या कामाला गती देण्यात आली असून, सध्या परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहरापर्यंत एका बाजूने रस्त्याची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय दूर झाली आहे. या रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करुन जिंतूर- परभणी हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

ग्रामीण बससेवेला लागेना मुहूर्त

परभणी : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एस.टी. महामंडळाने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत प्रमुख मार्गावरील बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातील बसफेऱ्या अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना जिल्ह्याचे अथवा शहराचे ठिकाण गाठण्यासाठी खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. खाजगी वाहतुकीने प्रवास करताना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.

जायकवाडी कालव्याचे पाणी दाखल

परभणी : जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. रबी हंगामातील तिसरे पाणी आवर्तन शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.