शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अनलॉकनंतर मराठवाड्यासाठी केवळ चारच रेल्वे गाड्या असल्याने प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 18:14 IST

राज्य शासनाने राज्यात रेल्वे वाहतूक सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होईल, अशी आशा होती.

ठळक मुद्देमराठवाडा एक्स्प्रेसची मागणी जोर धरु लागली२०० कि.मी.च्या निर्णयाचा फटका

परभणी :  अनलॉकच्या प्रक्रियेनंतर दिवाळी सणासाठी सुरू केलेली नांदेड- पनवेल ही विशेष रेल्वेगाडीही बंद केली जाणार असून, केवळ तीन ते चार रेल्वे गाड्याच मराठवाड्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश वेळा आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

राज्य शासनाने राज्यात रेल्वे वाहतूक सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होईल, अशी आशा होती. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नांदेड- पनवेल ही रेल्वे गाडी सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे काही दिवस मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वेसेवाही चालविण्यात आली.  मात्र मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तर पनवेल एक्स्प्रेस २९ तारखेपर्यंतच धावणार आहे.  त्यानंतर मात्र दिल्लीसाठी सचखंड एक्स्प्रेस, मुंबईसाठी नंदीग्राम एक्स्प्रेस आणि हैदराबादसाठी परभणी - हैदराबाद व औरंगाबाद- हैदराबाद या चारच रेल्वे गाड्या धावत आहेत.

या चारही गाड्यांना बहुतांश वेळा आरक्षण फुल्ल झालेले असते. त्यामुळे नांदेड, परभणी या स्थानकावरुन औरंगाबाद येथे जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण मिळत नाही. विशेष म्हणजे औरंगाबाद, मनमाडपर्यंतच मराठवाड्यातून सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. ही बाब लक्षात घेता मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. मात्र अद्याप या सेवेला हिरवा झेंडा मिळाला नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

२०० कि.मी.च्या निर्णयाचा फटकारेल्वे विभागाने २०० कि.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्याच रेल्वे गाड्या सुरू करण्याचे धोरण ठरविले आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना मराठवाड्यातील गावे गाठण्यासाठी पर्यायी वाहतूक सुविधेचाच वापर करावा लागत आहे.  मराठवाड्यातून औरंगाबाद येथे विविध कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्व सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी आहे.  ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेparabhaniपरभणीMarathwadaमराठवाडाtourismपर्यटन