शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

परभणी जिल्ह्यात शेतकरी हवालदिल :पालममध्ये कमी दाबाने वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:23 AM

तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़पालम तालुक्यात सहा ३३ केव्ही उपकेंद्रातून गावठाण व शेतातील कृषीपंपांना वीजपुरवठा केला जातो़ सहा उपकेंद्रांना गंगाखेड येथून केवळ एका वीज वाहिनीवरून वीज पुरवठा केला जात असल्याने तांत्रिक बिघाडात वाढ होत आहे़क्षमतेपेक्षा जास्त विजेची मागणी होत असल्याने तसेच गंगाखेड येथून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने महावितरणच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे़ आठ दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध असूनही विजेच्या कमी दाबामुळे कृषीपंप चालत नाहीत़केरवाडी फिडरला : सर्वाधिक फटकाकेरवाडी फिडरमधून १८ गावांना वीज पुरवठा केला जातो़ दोन विभागात गावे विभागूनही पुरवठा सुरळीत होत नाही़ जुनाट यंत्रणा असल्याने नेहमीच तांत्रिक बिघाड होतात़ गोदाकाठची गावे व कृषीपंपांचा मोठा भार असल्याने या फिडरवरील गावांना नेहमीच वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होत असलयाने फटका सहन करावा लागत आहे़पालम तालुक्यात ग्रामीण भागात विविध फीडरचे लाईनमनच्या मदतीने दोन भाग करून वीज पुरवठा केला जात आहे. पालमच्या केंद्रात २०० एम्पीयरपर्यंत लोड सहन करणारी यंत्रणा आहे. पण फीडर चालू करताच हा भार २३० ते २४० पर्यत जात आहे. त्यामुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे.-व्ही. डी. स्वामी, उपकार्यकारी अभियंता, पालम

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन