शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात पाच दिवसांत झाला ६८ दलघमीचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 20:35 IST

 मागील आठवड्यात झालेला पाऊस प्रकल्पांसाठी समाधानकारक ठरला

परभणी:  मागील आठवड्यात झालेला पाऊस प्रकल्पांसाठी समाधानकारक ठरला असून जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये पाच दिवसांमध्ये तब्बल ६८.६७४ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. पाच दिवसांपूर्वीच्या पाणीसाठ्यामध्ये १४.६९ टक्क्यांनी वाढ झाल्याने हा पाऊस प्रकल्पांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.

जिल्ह्यात येलदरी, निम्न दुधनासह मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. २३ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली होती. प्रकल्पही कोरडे होते; परंतु, पिकांसाठीच पाणी नाही तर प्रकल्पांची चिंता दूरची असल्याने शेतकरी पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा करीत होते. स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर १९ व २० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिके तगली. त्याच जोडीला प्रकल्पांचा पाणीसाठाही वाढला आहे. 

१८ आॅगस्ट रोजी येलदरी प्रकल्पामध्ये १६.६५२ दलघमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. २३ आॅगस्ट रोजी या प्रकल्पात ५२.२१४ दलघमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्याची टक्केवारी ६.४५ एवढी आहे. निम्न दुधना प्रकल्पात १८ आॅगस्ट रोजी ५१.९८० दलघमी जलसाठा उपलब्ध होता. आता हा जलसाठा ६५.९८० दलघमीवर गेला आहे. मासोळी प्रकल्प १८ आॅगस्ट रोजी कोरडाठाक होता. या प्रकल्पात सध्या १.१२० दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. डिग्रस बंधाऱ्यात ३९.७९० दलघमी पाणी १८ आॅगस्ट रोजी उपलब्ध होते. सध्या या बंधाऱ्यात ४१.६६० दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मुद्गल आणि ढालेगावचे बंधारे तर या काळात ओव्हरफ्लो झाले.  १८ आॅगस्टनंतर जिल्ह्यात सलग दोन दिवस सरासरी ५० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या पावसाळ्यामुळे प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नसून अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

मुद्गल बंधाऱ्याला सर्वाधिक लाभ१८ आॅगस्ट रोजी पाथरी तालुक्यातील मुद्गल बंधाऱ्यामध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. २.५८० दलघमी पाणीसाठा या प्रकल्पामध्ये पावसापूर्वी होता. २३ आॅगस्ट रोजी प्रकल्पाच्या घेतलेल्या नोंदीनुसार सध्या या प्रकल्पात ११.३६० दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला असून हा प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरला आहे. पाच दिवसांच्या या काळात प्रकल्पामध्ये ८.८ दलघमीची वाढ झाली असून ७७ टक्के पाणीसाठा या काळात उपलब्ध झाला आहे. तर करपरा मध्यम प्रकल्पामध्ये हा पाऊस समाधानकारक ठरला. या प्रकल्पामध्ये ८.२७९ दलघमी (३३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या प्रकल्पात १४.२६० दलघमी (५७ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. 

मुळीची मात्र उलटी गंगाजिल्ह्यातील इतर प्रकल्प आणि बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असताना गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्यात मात्र पाऊस झाल्यानंतरच्या काळात बंधाऱ्यातील पाणीसाठा घटला आहे. १८ आॅगस्ट रोजी मुळी येथील बंधाऱ्यात १.२१७ दलघमी (१२.१० टक्के) जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. २३ आॅगस्ट रोजी या बंधाऱ्यात ०.९४६ दलघमी (९.४१ टक्के)पाणीसाठा शिल्लक आहे. ५ दिवसांमध्ये जमा झालेले ०.२७१ दलघमी पाणी वाहून गेले आहे. या बंधाऱ्याच्या गेटचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठाच होत नाही.

५ दिवसांत जमा झालेले पाणी

प्रकल्प    दलघमी    टक्केवारीयेलदरी    ३५.५६२    ४.४दुधना     १३.९१    ४.५करपरा    ५.९९    २४मासोळी    १.१२    ४ डिग्रस     १.८७    २.९७मुद्गल    ८.८    ७७.४३ढालेगाव    १.४९    २०पिंपळदरी    ०.०१    ०.२३एकूण       ६८.६७    १४.६९

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पparabhaniपरभणी