शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

परभणी जिल्ह्यात पाच दिवसांत झाला ६८ दलघमीचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 20:35 IST

 मागील आठवड्यात झालेला पाऊस प्रकल्पांसाठी समाधानकारक ठरला

परभणी:  मागील आठवड्यात झालेला पाऊस प्रकल्पांसाठी समाधानकारक ठरला असून जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये पाच दिवसांमध्ये तब्बल ६८.६७४ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. पाच दिवसांपूर्वीच्या पाणीसाठ्यामध्ये १४.६९ टक्क्यांनी वाढ झाल्याने हा पाऊस प्रकल्पांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.

जिल्ह्यात येलदरी, निम्न दुधनासह मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. २३ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली होती. प्रकल्पही कोरडे होते; परंतु, पिकांसाठीच पाणी नाही तर प्रकल्पांची चिंता दूरची असल्याने शेतकरी पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा करीत होते. स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर १९ व २० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिके तगली. त्याच जोडीला प्रकल्पांचा पाणीसाठाही वाढला आहे. 

१८ आॅगस्ट रोजी येलदरी प्रकल्पामध्ये १६.६५२ दलघमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. २३ आॅगस्ट रोजी या प्रकल्पात ५२.२१४ दलघमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्याची टक्केवारी ६.४५ एवढी आहे. निम्न दुधना प्रकल्पात १८ आॅगस्ट रोजी ५१.९८० दलघमी जलसाठा उपलब्ध होता. आता हा जलसाठा ६५.९८० दलघमीवर गेला आहे. मासोळी प्रकल्प १८ आॅगस्ट रोजी कोरडाठाक होता. या प्रकल्पात सध्या १.१२० दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. डिग्रस बंधाऱ्यात ३९.७९० दलघमी पाणी १८ आॅगस्ट रोजी उपलब्ध होते. सध्या या बंधाऱ्यात ४१.६६० दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मुद्गल आणि ढालेगावचे बंधारे तर या काळात ओव्हरफ्लो झाले.  १८ आॅगस्टनंतर जिल्ह्यात सलग दोन दिवस सरासरी ५० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या पावसाळ्यामुळे प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नसून अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

मुद्गल बंधाऱ्याला सर्वाधिक लाभ१८ आॅगस्ट रोजी पाथरी तालुक्यातील मुद्गल बंधाऱ्यामध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. २.५८० दलघमी पाणीसाठा या प्रकल्पामध्ये पावसापूर्वी होता. २३ आॅगस्ट रोजी प्रकल्पाच्या घेतलेल्या नोंदीनुसार सध्या या प्रकल्पात ११.३६० दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला असून हा प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरला आहे. पाच दिवसांच्या या काळात प्रकल्पामध्ये ८.८ दलघमीची वाढ झाली असून ७७ टक्के पाणीसाठा या काळात उपलब्ध झाला आहे. तर करपरा मध्यम प्रकल्पामध्ये हा पाऊस समाधानकारक ठरला. या प्रकल्पामध्ये ८.२७९ दलघमी (३३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या प्रकल्पात १४.२६० दलघमी (५७ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. 

मुळीची मात्र उलटी गंगाजिल्ह्यातील इतर प्रकल्प आणि बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असताना गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्यात मात्र पाऊस झाल्यानंतरच्या काळात बंधाऱ्यातील पाणीसाठा घटला आहे. १८ आॅगस्ट रोजी मुळी येथील बंधाऱ्यात १.२१७ दलघमी (१२.१० टक्के) जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. २३ आॅगस्ट रोजी या बंधाऱ्यात ०.९४६ दलघमी (९.४१ टक्के)पाणीसाठा शिल्लक आहे. ५ दिवसांमध्ये जमा झालेले ०.२७१ दलघमी पाणी वाहून गेले आहे. या बंधाऱ्याच्या गेटचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठाच होत नाही.

५ दिवसांत जमा झालेले पाणी

प्रकल्प    दलघमी    टक्केवारीयेलदरी    ३५.५६२    ४.४दुधना     १३.९१    ४.५करपरा    ५.९९    २४मासोळी    १.१२    ४ डिग्रस     १.८७    २.९७मुद्गल    ८.८    ७७.४३ढालेगाव    १.४९    २०पिंपळदरी    ०.०१    ०.२३एकूण       ६८.६७    १४.६९

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पparabhaniपरभणी