कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 17:34 IST2021-09-23T17:34:00+5:302021-09-23T17:34:20+5:30
आर्थिक विवंचनेत उचले टोकाचे पाउल

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या
पाथरी ( परभणी ) : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील देवगाव येथे उघडकीस आली. कैलास संतराम गायकवाड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देवगाव येथील शेतकरी कैलास संतराम गायकवाड ( 35 ) मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी घरातून काही न सांगता बाहेर पडला. नातेवाईकांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह लिंबाच्या झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्याच्या पश्चात पत्नी-मुलगा, आई-वडील असा परिवार आहे.
या प्रकरणी मायताचे वडील संतराम यशवंतराव गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. शेतात उत्पन्न होत नाही. वडिलांच्या नावे असलेले स्टेट बँकेचे कर्ज कसे फेडावे ? या कारणावरून मुलाने आत्महत्या केली. दरम्यान, पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जीएम कराड करीत आहेत.