शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार शेतकऱ्यांना अग्रिम देण्याकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST

गंगाखेड : अतिवृष्टीने बाधित झालेल्या तुरीचा पंचनामा करून अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ३ ...

गंगाखेड : अतिवृष्टीने बाधित झालेल्या तुरीचा पंचनामा करून अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ३ हजार ६९९ शेतकऱ्यांची ३ हजार ५६ हेक्टरवर तूर बाधित झाल्याचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवला. त्यापैकी ९४८ हेक्टरवरील तूर पिकाचा विमा शेतकऱ्यांनी काढला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम कंपनीने देणे बंधनकारक होती. मात्र, त्याकडे कानाडोळा करण्यात आला.

गंगाखेड तालुक्यात ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी होऊन तूर पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेत जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तूर पिकाच्या बाधित क्षेत्राचा पंचनामा करून अहवाल पाठविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तूर पिकाची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व महसूलच्या अधिकाऱ्यांनी गावनिहाय पथक स्थापन केले होते. या पथकात मंडळ अधिकारी, कृषी सहायक अधिकारी, तलाठी व विमा कंपनीचा अधिकारी, तसेच गावचा शेतकरी किंवा लोकप्रतिनिधी आदींची नियुक्ती केली होती. या पथकाने आपापल्या भागातील नुकसानग्रस्त तुरीचा पंचनामा केला. यामध्ये गंगाखेड मंडळ क्षेेत्रात ४१३ हेक्टरवरील तूर बाधित झाल्याचा अहवाल दिला. त्याचबरोबर राणीसावरगाव मंडळात ४६३ हेक्टर, महातपुरी मंडळात १,०४४ हेक्टर, माखणी मंडळात ६६२, तर पिंपळदरी महसूल मंडळात ४७५ हेक्टरवरील तूर पिकास फटका बसल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला. जिल्हा प्रशासनाने गंगाखेड तालुक्यात ४ हजार ६२६ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला असून, त्यापैकी अतिवृष्टीने ३ हजार ५६ हेक्टरवरील तूर पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे ३ हजार ६९९ शेतकऱ्यांनी ९४८ हेक्टरवरील तूर पिकाचा विमा उतरविला आहे. त्यामुळे हे शेतकरी तूर पिकाच्या अग्रिम रकमेसाठी पात्र आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना २५ दिवसांच्या आत अग्रिम रक्कम देणे बंधनकारक होते. मात्र, त्याकडे या विमा कंपनीने कानाडोळा केला आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप

रिलायन्स जनरल इन्शुरन्स व इतर कंपन्यांकडून नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला मागील काही वर्षांपासून देताना आखडता हात घेतला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके विमा कंपनीकडे संरक्षित करूनही मोबदला देण्यासाठी कंपन्यांकडून कानाडोळा केला जात आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधीही उदासीन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.