शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ६४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : मागील वर्षभरात ६४ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतीच्या समस्यांना वैतागून मृत्यूला कवटाळले. त्यापैकी १७ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : मागील वर्षभरात ६४ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतीच्या समस्यांना वैतागून मृत्यूला कवटाळले. त्यापैकी १७ शेतकऱ्यांना शासकीय मदत नाकारण्यात आली असून, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचा जीवन मरणाचा संघर्ष सुरू आहे.

शेती निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस अधिक झाला तरी नुकसान आणि पावसाने पाठ फिरवली तरीही नुकसान. त्यामुळे या व्यवसायात नुकसान अधिक आणि नफा कमी, अशी परिस्थती मागील काही वर्षांपासून निर्माण झाली आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या आशेवर पेरणी करायची, घरातील पैसा जमवून शेतीत गुंतवणूक करायची. सुरुवातीचे काही दिवस पीक जोमात येते. परंतु, एकाच संकटात होत्याचे नव्हते होते आणि नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे वारंवार होणारी नापिकी, त्यातून बँकांकडील कर्जाचा वाढलेला डोंगर या चिंतेने ग्रासलेल्या अनेक शेतकऱ्यांनी जिल्ह्यात आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलले आहे.

मागील वर्षात कोरोनाचे संकट निर्माण झाले होते. या नव्या संकटाने जिल्हावासीय भयभीत असले तरी शेतीसमाेरील समस्या संपलेल्या नव्हत्या. या काळातही जिल्ह्यात ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून खातरजमा करण्यात आली. त्यामध्ये ४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाच्या निकषाला पात्र ठरल्याने या शेतकरी कुटुंबियांना प्रतिकुटूंब १ लाख रुपये याप्रमाणे ४५ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मात्र, दुसरीकडे १७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रशासनाने अपात्र ठरविल्या आहेत. त्यामुळे हे शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित आहेत. दोन प्रकरणांमध्ये अद्याप चौकशी पूर्ण झाली नाही. शेतकरी आत्महत्येनंतर कुटुंबियांचे मोठे हाल होतात. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने उत्पन्नाचे मार्ग बंद होऊन मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा अनेक समस्या समोर उभ्या राहतात. अशाही परिस्थितीत धीर धरत अनेक कुटुंबियांनी स्वत:ला सावरले आहे.

तीन महिन्यात १८ प्रकरणे

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याची बाब आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

मागील वर्षी १२ महिन्यांमध्ये ६४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. मात्र, यावर्षीच्या अडीच महिन्यांतच १८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

आत्महत्या केलेल्या या प्रकरणांपैकी ५ प्रकरणे पात्र ठरली असून, १३ प्रकरणांची प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.

जानेवारी महिन्यात शेतकरी आत्महत्येची ६ प्रकरणे झाली होती. त्यापैकी ४ प्रकरणे पात्र ठरली असून, २ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.

फेब्रुवारी महिन्यात ४ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यातील १ प्रकरण पात्र ठरले असून, ३ प्रकरणात चौकशी सुरू आहे. तर १ ते १४ मार्च या काळात ८ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यांची चौकशी सुरू आहे.